27 April 2025 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
x

Bharat Bandh | शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन

Bharat Bandh, Nationwide farmers strike, Farmers Bills, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : संसदेत विरोधकांचा विरोध डावलून सविस्तर चर्चा न करताच संमत करण्यात आलेली कृषी विधेयके मोदी सरकारच्या अंगाशी आलेली दिसत आहेत. या तीन कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंद आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात भारतीय शेतकरी युनियनसहीत वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामील झाल्या आहेत. देशभर चक्का जाम करण्याची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये ३१ संघटनांचा समावेश आहे.

शेतकरी संघटनांना काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, अकाली दल, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यासहीत अनेक पक्षांकडून पाठिंबा मिळालाय. विधेयकाचा निषेध करत मोदी मंत्रिमंडळातील मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवलाय. या विधेयकाचा सर्वात जास्त विरोध पंजाब आणि हरियाणामध्ये दिसून येतोय. पंजाबमध्ये गुरुवारपासून तीन दिवसांचं रेल रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावरच ठाण मांडून विधेयक परत घेण्याची मागणी केलीय.

काँग्रेसकडूनही या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. शेतकऱ्यांविरोधात आणलेल्या या विधेयकावर काँग्रेसने पुढील 2 महिने जनआंदोलन पुकारण्याची घोषणा केली आहे. मंगळवारीही पंजाब-हरियाणातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत या विधेयकाला विरोध केला. पंजाबमधील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीन दिवसांचे रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. त्यानंतर अनेक रेल्वे गाड्या स्थगित करण्यात आल्या. या आंदोलनमुळे 24 ते 26 सप्टेंबरदरम्यान विशेष गाड्यांच्या 14 जोड्या धावणार नाहीत, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातही हे आंदोलन तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटली आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारचे जमीन अधिग्रहण बिलात बदल करण्याचे प्रयत्न ज्याप्रकारे उधळण्यात आले त्या प्रकारे कृषी कायद्याचा अंमल करण्याचे सरकारचे प्रयत्न शेतकरीच उधळून लावतील, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप या सगळ्याला कशाप्रकारे सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

News English Summary: All India Farmers Union (AIFU), Bharatiya Kisan Union (BKU), All India Kisan Mahasangh (AIKM), and All India Kisan Sangharsh Coordination Committee (AIKSCC) announced a nationwide bandh. Farmers’ bodies from Karnataka, Tamil Nadu and Maharashtra have also called for a shutdown.

News English Title: Bharat Bandh Nationwide farmers strike today Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या