17 April 2025 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

भारत बंद, सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात एल्गार

मुंबई : दलित संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. परंतु आता या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे.

परंतु या बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दलित संघटनांन मधील आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर तुफान दगडफेक केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे. बिहार राज्यात बऱ्याच ठिकाणी रेल रोको करण्यात आल्याचे समजते. मुंबईमध्ये तरी अजून या बंदचा परिणाम झाला असल्याचे समजते.

गुजरातमधील राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी या बंदची माहिती ट्विटरवरुन प्रसिद्ध केली आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक करता येणार नाही. असा निर्णय येण्याचं मुख्य कारण म्हणजे मोदीसरकारने कोर्टात कमकुवत बाजू मंडळी आणि त्यातूनच हा निर्णय आल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी भाजप सरकारवर केला आहे.

परंतु केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केले आहे की, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकार पुढे कोणते पाऊल उचलते ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bharat Band(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या