17 April 2025 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

तेलंगणा राज्य काँग्रेसमुक्तीच्या दिशेने; १९ पैकी १२ आमदारांचा गट टीआरएसमध्ये विलिन

Telangana, Telangana Rashtra Samithi

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत देशभर मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याचा परिणाम आता इतर राज्यांत दिसू लागला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना पक्षात राहणे देखील धोक्याचे वाटू लागले असून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी स्पर्धा सूर झाली आहे. सत्तेत असलेल्या चंद्रशेखर राव यांच्या पक्षात काँग्रेस विधीमंडळ पक्ष विलिन करण्याचे पत्रच १२ आमदारांनी दिले आहे.

तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता असून त्यांच्याकडे १२० पैकी ९१ जागांचे बहुमत आहे. तर एमआयएम ७ आणि काँग्रेसचे १९ आमदार आहेत. काँग्रेसच्या १९ पैकी १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पोचराम श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे जाऊन काँगेस विधीसंमडळ पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विलिन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

काँग्रेस प्रदेश समितीनेही नुकतेच आमदार रोहित रेड्डी हे राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. तसेच टीआरएस पक्षात जातील असे म्हटले होते. रेड्डी यांचे गेल्या वर्षी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर टीआरएसने निलंबन केले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या १२ आमदारांनी विलिनीकरणाचे पत्र दिल्याने आता काँग्रेसकडे ६ आमदारांचे संख्याबळ राहिले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Rahul Gandhi(251)#TRS(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या