23 February 2025 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

तेलंगणा राज्य काँग्रेसमुक्तीच्या दिशेने; १९ पैकी १२ आमदारांचा गट टीआरएसमध्ये विलिन

Telangana, Telangana Rashtra Samithi

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत देशभर मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याचा परिणाम आता इतर राज्यांत दिसू लागला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना पक्षात राहणे देखील धोक्याचे वाटू लागले असून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी स्पर्धा सूर झाली आहे. सत्तेत असलेल्या चंद्रशेखर राव यांच्या पक्षात काँग्रेस विधीमंडळ पक्ष विलिन करण्याचे पत्रच १२ आमदारांनी दिले आहे.

तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता असून त्यांच्याकडे १२० पैकी ९१ जागांचे बहुमत आहे. तर एमआयएम ७ आणि काँग्रेसचे १९ आमदार आहेत. काँग्रेसच्या १९ पैकी १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पोचराम श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे जाऊन काँगेस विधीसंमडळ पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विलिन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

काँग्रेस प्रदेश समितीनेही नुकतेच आमदार रोहित रेड्डी हे राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. तसेच टीआरएस पक्षात जातील असे म्हटले होते. रेड्डी यांचे गेल्या वर्षी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर टीआरएसने निलंबन केले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या १२ आमदारांनी विलिनीकरणाचे पत्र दिल्याने आता काँग्रेसकडे ६ आमदारांचे संख्याबळ राहिले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Rahul Gandhi(251)#TRS(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x