23 February 2025 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

शेतकऱ्यांना लाल किल्यावर जाऊ दिलं | गृहमंत्र्यांना विचारा यामागे काय कल्पना होती? - राहुल गांधी

Congress, Rahul Gandhi, Modi government, Farmers issue

नवी दिल्ली, २९ जानेवारी: तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर आहेत. प्रजासत्ताक दिवशी आयटीओ, लाल किल्ला आणि नांगलोई या भागात हिंसा झाली. आजही गाजीपूर आणि सिंघु बॉर्डरवर तणावाची स्थिती आहे. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, तीनही कायदे समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, तीनही कायदे कशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवतील.

नवीन कृषी कायदे रद्द करा आणि कचऱ्याच्या टोपलीत टाका. आता हा एकच पर्याय उरला आहे. नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक आहेत. शेतकऱ्यांना होणारी मारहाण ही दुर्दैवी आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना मारहाण करून देश कमकुवत करत आहे. या फायदा देशविरोधी शक्तींना होईल, असा घणाघात राहुल गांधी यांनी केलाय.

प्रजासत्ताक दिनाच्या वेळी झालेल्या या हिंसाचाराबाबत राहुल गांधी म्हणाले की, 50 शेतकऱ्यांना लाल किल्याच्या आत जाऊ दिलं. हे रोखणं गृहमंत्रालयाचं काम नव्हतं. गृह मंत्र्यांना विचारा यामागे काय कल्पना होती? पंतप्रधान पाच व्यावसायिकांसाठी काम करतात. त्यांच्यासाठी नोटाबंदी आणण्यात आली, जीएसटी त्यांच्यासाठी आणि कृषी कायदादेखील त्यांच्यासाठी आणण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मागे हटण्याची गरजनाही. आम्ही त्यांना सहकार्य करू. हे आंदोलन ऐवढ्यात थांबणार नाही, हे शहरांमधून गावांपर्यंत पोहोचेल.

 

News English Summary: Farmers are on the streets against three agricultural laws. Violence erupted in ITO, Red Fort and Nangloi areas on Republic Day. Even today, there is tension on the Ghazipur and Singhu borders. Former Congress president Rahul Gandhi held a press conference on the whole issue. In it, he said, all three laws need to be understood. He made it clear how all three laws would harm farmers.

News English Title: Congress leader Rahul Gandhi criticised Modi government over farmers issue news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x