19 April 2025 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

मोदींच्या सत्ताकाळात कोरोनामुळे तुमचा जीव वाचेल त्यालाच 'विकास' समजा - काँग्रेस

Congress leader Surendra Rajput

नवी दिल्ली, २८ एप्रिल | कोरोनाने गेल्या एक वर्षात दोन लाखांपेक्षा जास्त लोक आपल्यातून हिरावून घेतले. मंगळवारी देशात सर्वाधिक ३,२८५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी आकडेवारीत २,०१,१६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. तथापि, खरे आकडे यापेक्षाही खूप जास्त आहेत. त्याचबरोबर देशात प्रथमच एका दिवसात २.६२ लाख लोकांनी कोरोनावर मात केली ही दिलासादायक बातमीही आली. आतापर्यंत १.४८ कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान, मंगळवारी ३,६२,७५७ नव्या रुग्णांसह एकूण रुग्णांचा आकडा १.७९ कोटींवर गेला. चिंतेची बाब म्हणजे बरे होण्याचा दर घसरून ८२.३% झाला आहे, हा दर याच वर्षी १७ फेब्रुवारीला ९७.३३ टक्के होता. भारतात कोरोनामुळे पहिला मृत्यू गेल्या वर्षी १२ मार्चला झाला होता. महामारीच्या दुसऱ्या लाटेत आकडे रोज नवा विक्रम घडवत आहेत. १० सर्वाधिक प्रभावित राज्यांतच एप्रिलमध्ये मृतांची संख्या ५ पट वाढली आहे. अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर आता भारत दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेला चौथा देश आहे.

दरम्यान, देशातील इस्पितळं आणि स्मशानभूमीच्या बाहेरील स्थिती अत्यंत भयाण झाल्याचं पाहायला मिळतंय. लोकांपुढे जीव वाचवणं हेच ध्येय असल्याचं अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतंय. या परिस्थितीमुळे सर्वत्र गंभीर वातावरण झालं असून त्याचे प्रतिबिंबं इस्पितळाबाहेरील आणि स्मशानभूमीबाहेरील लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळतंय. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेंद्र राजपूत यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “मोदींच्या सत्ताकाळात कोरोनामुळे तुमचा जीव वाचेल त्यालाच ‘विकास’ समजा”.

 

News English Summary: Corona has deprived more than two million people of us in the last one year. The highest death toll in the country was 3,285 on Tuesday, with government figures showing 2,01,165 deaths due to corona. However, the real figures are much higher than this. At the same time, for the first time in the country, 2.62 lakh people overcame Corona in a single day. So far, 1.48 crore people have been cured of corona.

News English Title: Congress leader Surendra Rajput criticized Modi govt over situation created in India after corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या