23 February 2025 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भाजपाचा नारा बेटी बचाओ नाही | तथ्य लपवा आणि सत्ता वाचवा - राहुल गांधी

Congress MP Rahul Gandhi, Uttar Pradesh, Yogi Government, Hathras Gangrape

लखनऊ, १ ऑक्टोबर: हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीआय अथवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाने याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशऐवजी दिल्ली पोलिसांकडे हा तपास देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कार आणि अमानुष हत्येच्या घटनेतील पीडित दलित मुलीचे कुटुंबीय अद्यापही भीतीच्या छायेखाली आहे. “काहीही घडू शकतं, आम्हाला सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे गाव सोडण्याचा विचार आहे,” असं पीडितेच्या भावानं म्हटलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

पीडितेच्या भावानं म्हटलं, “आम्ही या गावात सुरक्षित नाही. ते आमच्यासोबत काहीही करु शकतात. आमचा पोलिसांवर आणि प्रशासनावर विश्वास नाही. आम्हाला आता अधिकच भीती वाटू लागली आहे. आम्ही आता यापूर्वीपेक्षा त्यांच्या अधिकच रडारवर आहोत. ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत. त्यामुळे आम्ही आता गावही सोडू शकतो. आमचा राजकारण्यांवरही विश्वास नाही.” दुसरीकडे बलरामपूरमध्ये देखील एका युवतीवर गँगरेप करण्यात आला असून तिचे पाय देखील तोडण्यात आले आहेत. त्यानंतर या पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे.

या परिस्थितीला अनुसरून राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘यूपीच्या जंगलराजमध्ये मुलींचा आणि सरकारवरील छळ हा अजूनही सुरूच आहे. कधीही जिवंत असताना सन्मान दिला नाही आणि त्यानंतर अंत्यसंस्काराचा अधिकार देखील काढून घेतला. भाजपाची घोषणा ‘मुलगी वाचवा’ नाही, तर ‘तथ्य लपवा, सत्ता वाचवा’, अशी आहे.

 

News English Summary: Following this situation in Hathras and Balrampur, congress leader Rahul Gandhi has criticized the Yogi government of Uttar Pradesh. In this regard, he said in a tweet that, ‘The harassment of girls and the government is still going on in Jangalraj, UP. He was never honored while alive, and later withdrew his right to a funeral.

News English Title: Congress MP Rahul Gandhi criticized Uttar Pradesh Yogi Government after Hathras Gangrape Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x