23 February 2025 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा | एम्स डॉक्टरांचं आवाहन

Coronavirus, Randeep Guleria, AIIMS vaccine

नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली दिसून येतेय. मात्र, करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याच्या चर्चांना एम्सचे संचालक डॉक्टर गुलेरिया यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलंय. करोना संक्रमणाच्या प्रकरणांत वाढ झाल्याचं दिसून येत असेल तर यामागे लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. सोबतच त्यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आणि मास्कचा वापर करण्याचीही पुन्हा एकदा आवर्जुन आठवण करून दिलीय.

प्रदूषणामुळे विषाणू जास्त काळ हवेमध्ये राहतात. प्रदूषण आणि व्हायरस दोन्ही फुफ्फुसांवर परिणाम करतात. कोरोना विषाणूचा प्रसार अद्याप आटोक्यात आलेला नाही. युरोप आणि इतर देशांचे उदाहरण देत डॉ. गुलेरिया म्हणाले की, ”मास्कचा वापर करायला हवा. आवश्यक काम नसल्यास घराबाहेर जाऊ नये. जर व्हायरसपासून बचावसाठी खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा प्रसार अजून वाढू शकतो. तरूणाई या व्हायरसच्या प्रसाराबाबत जास्त गंभीर नाही. अनेकजण निष्काळजीपणा करताना दिसून येत आहे. तरूणांना वाटतं की सौम्य संक्रमण झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या माध्यमातून घरातील वृद्धांपर्यंत संक्रमण पोहोचत आहे. ”

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या ही 15 लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात राज्यात 8,241 जणांनी कोरोनावर मात केली तर 6,190 नवे रुग्ण आढळून आलेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्याही 15,03,050 एवढी झालीय. तर रुग्णांची एकूण संख्या ही 16,72,858 एवढी झाली आहे. राज्यात आज 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा हा 43,837वर गेला आहे. राज्यात सध्या 1,25,418 जणांवर उपचार सुरू आहेत.

 

News English Summary: AIIMS Director Dr Guleria categorically refuted the rumors that the third wave of corona had started. He said that if there was an increase in cases of corona infection, it was due to the negligence of the people. Speaking to a news channel, Dr. Guleria gave this explanation. He also reminded the citizens to follow the rules of social distance and use masks.

News English Title: Coronavirus Randeep Guleria AIIMS vaccine infection social distancing News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x