अजब दावा? ईव्हीएमवर खापर फोडणे ही गुन्हेगारी मानसिकता: मुख्य निवडणूक आयुक्त

कोलकत्ता : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केल्याचे आरोप हे अन्यायकारक असून त्यात गुन्हेगारी स्वरूपाचा कुटील हेतू आहे असे मत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी व्यक्त केले. शनिवारी येथे आयआयएम कलकत्ता या संस्थेच्या वार्षिक व्यावसायिक परिषदेत त्यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काही वेळा बिघडली असतीलही, जशी इतर यंत्रे बिघडतात तशी ही यंत्रेही बिघडू शकतात पण त्यात फेरफार करता येत नाही हे सिद्ध झालेले आहे.
तसेच मतदान यंत्रातील बिघाड व फेरफार यात फरक आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बिघडू शकतात पण त्यात फेरफार करता येत नाही, जे लोक त्यात फेरफार केल्याचा आरोप करतात त्यांचे हेतू गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्याचा आम्हाला खेद वाटतो. देशातील दोन मोठय़ा सार्वजनिक उद्योगांनी ही यंत्रे तयार केलेली असून ती नामांकित संस्थांचे प्राध्यापक व इतरांच्या देखरेखीखाली तयार केलेली आहेत.
CEC Sh. Sunil Arora addressing the Students of Indian Institute of Management Calcutta on their Annual Day Lattice on the theme “Conducting 17th Lok Sabha Elections: Desh Ka Maha Tyohar”. https://t.co/jGYqBttI1c
— Sheyphali Sharan (@SpokespersonECI) August 11, 2019
ते असेही म्हणाले की, दैनंदिन वापराच्या अन्य कोणत्याही यंत्राप्रमाणे मतदानयंत्रेही कधी तरी नीट चालली नाहीत, असे होऊ शकते; पण त्यात मुद्दाम कोणी घोटाळा करू शकत नाही, याची आयोगास ठाम खात्री आहे. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला, शरद पवार व राज ठाकरे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी ‘ईव्हीएम’बद्दल शंका घेणे सुरूच ठेवल्यानंतर अरोरा यांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेने मतदान घेणे अशक्य असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. निवडणूक कर्मचाऱ्यांचे कष्ट आणि समर्पण भावनेचे सर्व जण कौतुक करतात. आयोगाचे कर्मचारी हे सामान्य लोकांचे रक्षक असतात. राज्य सरकारकडून त्रास दिला जात असेल तर ते तुमचे रक्षण करतील.
दरम्यान, ईव्हीएमवर सर्वात पहिली शंका भारतीय जनता पक्षानेच घेतली होती. २००९ मधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम’मधील गैरप्रकारावरून खूप आगपाखड करत त्यावर बंदी आणत बॅलेट पेपरने निवडणुका घ्याव्या असा आग्रह धरला होता. स्वतः लालकृष्ण अडवाणी, रविशंकर प्रसाद आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जाहीर कार्यक्रमात आणि पत्रकार परिषद आयोजित करून ईव्हीएम’मधील गैरप्रकार उघड करत, बॅलेट पेपरची मागणी केली होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘खरंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी यामध्ये सामील होणं अपेक्षित होतं’ आणि नेमका हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे भाजप नेत्यांच्या ईव्हीएम’वरील शंकेने त्यांची देखील निवडणूक पद्धतीवर शंका होती असंच म्हणता येईल.
असं असलं तरी काही दिवसांपूर्वी मानस अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालचा दौरा करत याच विषयाला अनुसरून ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मात्र त्या नंतर एकूणच निरीक्षण केल्यास, मुख्य निवडणूक आयुक्त मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून ते जणू काही एखाद्या पक्षाचे नेते असल्यासारखी विधान करत आहेत आणि त्यांनी एकप्रकारे कॅम्पेनचं सुरु केल्यासारखी एकूण हालचाल आहे असं विरोधकांना वाटत आहे. त्यातच त्यांनी पुन्हा कोलकत्ता येथेच जाऊन पुन्हा नवं विधान केल्याने विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल