19 April 2025 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

युपी'मध्ये पावसामुळे १५ जणांचा मृत्यू तर १३३ इमारती कोसळल्या

Utter Pradesh, Yogi Sarkar, Yogi Government, Mayawati, Akhilesh Yadav, SP, BSP

लखनऊ : युपी’मध्ये पावसाचा हाहाकार मजल्याचे दिसत आहे. कारण सलग तीन दिवस धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. जोरदार वादळी वारा आणि वीज कोसळल्यामुळे आतापर्यंत एकूण १५ जणांचा दर्दैवि मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्यते उपचार सुरू आहेत.

दरम्यान पावसाच्या तडाख्यामुळे तब्बल १३३ इमारती कोसळल्याने त्यात अनेकजण गंभीर जखमी झाले असून अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. एकंदरीत पावसामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. जोरदार पावसाचा फटका हा जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. १३३ इमारती कोसळल्या आहेत. अनेकजण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांची घरं आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या