22 April 2025 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

गोध्रा हत्याकांडाप्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ला हे भाजपाच षडयंत्र: गुजरातचे माजी मुख्यमंत्री

Narendra Modi, Amit Shah, Pulawama, shankersinh vaghela, Loksabha Election 2019

नवी दिल्ली: गुजरातमधील बहुचर्चित गोध्रा हत्याकांडाप्रमाणेच जम्मू काश्मीरमधील पुलवामातला सीआरपीएफच्या जवानांवरील भ्याड दहशतवादी हल्लादेखील भारतीय जनता पक्षाच्या कारस्थानाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांनी केला आहे. पुलवामातल्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीची नोंद गुजरातमध्ये करण्यात आली होती, असा दुसरा दावादेखील त्यांनी केला. गोध्रा हत्याकांडदेखील भारतीय जनता पक्षाच मोठं षडयंत्र होतं. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून दहशतवादाचा आधार घेतला जातो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

बालाकोटमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राइक भाजपानं अगदी नियोजितपणे केलेला हल्ला होता, असा दावा वाघेला यांनी केला. दरम्यान ‘बालाकोटवर हवाई दलाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात कोणीही मारलं गेलं नाही. एअर स्ट्राइकमध्ये २०० जण मारले गेले नाहीत, हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेनं अधिकृतपणे सांगितलेलं नाही,’ याची आठवण वाघेला यांनी करून दिली. पुलवामा हल्ल्याची माहिती असूनही तो हल्ला होऊ दिला गेला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. ‘भारतीय गुप्तचर विभागानं पुलवामात हल्ला होणार असल्याची पूर्व कल्पना गृहमंत्रालयाला दिली होती. परंतु तरी देखील सदर हल्ला रोखण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं उचलण्यात आली नाहीत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.

बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकबद्दल वाघेला यांनी काही थेट सवाल उपस्थित केले. ‘बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची माहिती सरकारकडे आधीपासूनच होती. मग तिथे आधीच कारवाई का करण्यात आली नाही? पुलवामात हल्ला होण्याची वाट का पाहिली गेली?,’ असे प्रश्न त्यांनी विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलवरही वाघेलांनी भाष्य केलं. ‘भाजपाचं गुजरात मॉडेल खोटं आहे. गुजरातमध्ये अनेक अडचणी आहेत. राज्य संकटातून जात आहे. राज्यातले भाजपा नेते नाराज आहेत,’ असा दावा वाघेलांनी केला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या