23 February 2025 2:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

सामनात आणीबाणीवरून विरोधकांचा चिरकूट असा उल्लेख; पण उद्धव यांना बाळासाहेबांच्या भूमिकेचा विसर?

Udhav Thackeray, Shivsena

मुंबई : आजच्या सामना संपादकीय मध्ये आणीबाणीवरून मोदींची स्तुती करताना विरोधकांना शेळक्या भाषेत ‘चिरकूट’ असं संबोधण्यात आलं आहे. त्यात आणीबाणीच्या संदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आलं असलं तत्कालीन परिस्थितीत बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना भेटून आणीबाणीच समर्थन केलं होतं आणि शिवसेनेच्या वाढीसाठी त्याला संधी समजून वेगळीच भूमिका घेतली होती, त्याचा उल्लेख मात्र सामनामध्ये वगळण्यात आला आहे.

इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादून विरोधकांना एकजूट होण्याची संधी दिली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष विलीन झाले व त्यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव केला. काँग्रेसने आत्मा चिरडला, पण देशाचा आत्मा मेला नाही. लोकांनी काँग्रेसला धडा शिकवला. देशात इंदिरा गांधींचा, गांधी परिवाराचा, काँग्रेसचा पराभव होऊ शकतो हा विश्वास लोकांत निर्माण करण्याचे काम आणीबाणीने केले ही सकारात्मक बाजू लक्षात घेतली पाहिजे असं सामना संपादकीयमधून सांगण्यात आलं आहे.

तसेच मोदी हे हुकूमशहा आहेत किंवा अप्रत्यक्ष आणीबाणी लादत आहेत हे भय असते तर विरोधकांचे ऐक्य मजबूत व्हायला हवे होते. उलट जे झाले ते फुटले. याचे खापरही काँग्रेसवाले मोदींच्याच माथी मारणार काय? काँग्रेस व इतर चिरकूट विरोधकांनी आत्मचिंतनासाठी केदारनाथच्या गुहेतच जावे. मंथन करावे, चिंतन करावे असा टोलाही शिवसेनेने हाणला.

मात्र १९७५ मधील आणीबाणीच्या काळात सरकारच्या विरोधात बंड करणाऱ्या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. भाजपमधील तत्कालीन दिग्गज नेते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण आडवाणी यांच्यासारख्या नेत्यांना देखील तुरूंगात टाकण्यात आले. मात्र त्याउलट परिस्थितीचा राजकीय फायदा उचलत बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी लिहिले, “इंदिराजींना आणीबाणी संदर्भात थेट प्रक्षेपण करावे लागले, कारण त्यावेळी अशांती माजल्याने निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्याचा तो एकमेव पर्याय होता. मनुष्य आणि यंत्र यांच्यात आपल्याला फरक करावा लागेल. अकार्यक्षमतेपासून वाचविण्यासाठी मशीन बंद करणे आवश्यक आहे. जर सरकारी कर्मचारी शिस्त पाळण्यास तयार असतील तर आणीबाणीची परिस्थितीत अशा ठिकाणी विस्तारली जाऊ नये, ज्यामुळे आयुष्याची मशीन खराब होईल. त्यावेळी बाळासाहेबांनी वेगळीच भूमिका घेतली कारण त्यांना चांगलंच ठाऊक होते की, शिवसेनेला या काळात आणखी वाढवण्याची मोठी संधी आहे आणि त्यांच्या त्या भूमिकेमुळे त्यांना अटक देखील झाली नाही. दरम्यान ८० च्या दशकातच शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर आवाका वाढू लागला होता.

त्यामुळे सामना संपादकियचा आजचा विषय जरी मोदींची आणीबाणी संदर्भातील भाषणाची स्तुती आणि विरोधकांच्या तत्कालीन भूमिकेवर आगपाखड करण्यासाठी असली तरी उद्धव ठाकरे यांनी यांनी संपादकीयमध्ये बाळासाहेबांच्या तत्कालीन परिस्थितीतील भुमीकेचा मात्र उल्लेख टाळला आहे अन्यथा उद्धव ठाकरेंना तो इतिहासाचं माहित नसावा असंच म्हणावं लागले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x