16 April 2025 8:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

पुणे-सातारा रस्त्याच काम रखडविणाऱ्या 'रिलायन्सला' टोलवाढीची भेट

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पुणे (देहूरोड)- सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं केवळ अडीज वर्षाचं काम तब्बल साडेसात वर्ष रखडलेलं असताना देखील उलट सरकारच त्यांना वेळोवेळी मुदतवाढ करून देत होती आणि आता त्या दिरंगाईचा सरकारी नजराणा म्हणून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.

येत्या एप्रिलपासून या रस्त्यावरील खेडशिवापूर ते आणेवाडी टोलनाक्यावरील टोलच्या दरात वाढ केली जाणार असून ही रोजच्या प्रवाश्यांना वाईट बातमी आहे. ज्या ठेकेदाराला स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काळ्या यादीत शामिल करण्याचं भाष्य केलं होतं, परंतु पुन्हा रिलायन्सला वेळोवेळी सूट मिळत गेली आहे आणि इतकेच नाही तर ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.

वास्तविक या १०४ किलोमीटर रस्त्याचं काम ऑक्टोबर २०१० मध्ये सुरु झाले होते जे मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे सजग नागरिक मंचच्या वतीने माहितीच्या अधिकारात विवेक वेलणकर यांनी वेळोवेळी या कामाच्या प्रगती बाबत माहिती अधिकारात सरकारकडून तपशील मागवला. त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीत त्या रस्त्याच्या कामाबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर दिरंगाई करत असल्याचे उघड झाले आहे.

१४ ऑगस्ट २०१६ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी पुणे सातारा रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी अशा दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला होता परंतु तशी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

विवेक वेलणकर म्हणाले की जर काम वेळेत होत नसेल तर टोल बंद झाला पाहिजे. परंतु इथे उलट दिरंगाईच ‘टोलवाढ’ हे बक्षिसच सरकारने ठेकेदार कंपनीला दिले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Toll Cha Zol(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या