मोदी-शहांवरील अतिआत्मविश्वास भाजपाला नडतो आहे? सविस्तर वृत्त

रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने हिंदी भाषिक पट्ट्यातील अजून एक महत्वाचं राज्य गमावलं आहे. यावर सध्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरु असून मुख्य कारणं शोधण्याची प्रक्रिया पार पडत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्राथमिक स्तरावर अनेक धक्कादायक विषय समोर येत असून तीच प्राथमिक स्तरावर पराभवाची कारणं असल्याची खात्री वरिष्ठांना आहे.
झारखंड मध्ये आदिवासी मतदार मोठ्या संख्येने असून देखील मोदी-शहांनी आत्मविश्वासाने राष्ट्रीय मुद्देच भाषणांत रेटले आणि स्थानिक प्रश्न तसेच राहून गेल्याने विरोधकांनी नेमका त्याचाच फायदा घेत स्थानिक राजकारण ढवळून काढल्याचं पाहायला मिळालं. तसेच मोदी आणि शहांच्या सभांनी विजय मिळेल या भ्रमात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहिले आणि उलटपक्षी जिथे मोदी शहांच्या सभा झाल्या तिथलेच उमेदवार पडल्याची आकडेवारी समोर आली आहे. झारखंड सारख्या विकसित नसलेल्या राज्यात समाज माध्यमांचा प्रचारासाठी अति वापर करत, जमिनीवरील विषय दुरावले तिथेच घात झाला.
मोदी-शहा जोडी सर्व राज्यांमध्ये निर्णय क्षमता असणारा मुख्यमंत्री कधीच बसवत नाहीत, केवळ मोदी-शहा जेवढं सांगतील ते करत जाणारी व्यक्ती मुख्यमंत्री बसवली जाते आणि अप्रत्यक्षपणे संबंधित राज्य स्वतःच्या नियंत्रणात घेतलं जात. त्यासाठी संबंधित मुख्यमंत्र्यांना देखील अमर्याद स्वातंत्र दिलं जातं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सरकारचे निर्णय, तिकीट देण्याचे-कापण्याचे अधिकार, आघाडी करण्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकद उभी करण्याचं काम भाजपा नेतृत्त्वाकडून करण्यात आलं.
विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावर पैसा आणि जाहिरातबाजी करून देखील काहीच फायदा होताना दिसत नाही. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये होणारे पराभव पाहता या रणनीतीचा भारतीय जनता पक्षाकडून पुनर्विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे सदर विषय समोर येत असले तरी मोदी-शहा जोडी ते स्वतःपुरती किती स्वीकारतील ते पाहावं लागणार आहे. तसं ना झाल्यास २०२४ मध्ये गुजरातमध्ये देखील सुपडा साफ झाल्यास आश्चर्य वाटायला नको असं तज्ज्ञांचं मत आहे.
Web Title: Jharkhand Assembly Election 2019 has given Big Set Back to PM Narendra Modi and Amit Shah.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल