23 February 2025 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत शेतकरी आंदोलक घरी परतले

नवी दिल्ली : भारतीय किसान युनिअनची हरिद्वारहून निघालेली ‘किसान क्रांती पदयात्रा’ नवी दिल्लीतील किसान घाट येथे समाप्त करण्यात आली. काल रात्री उशिरा पोलिसांनी शेतकऱ्यांना किसान घाटावर जाण्याची अधिकृत अनुमती दिली. मात्र, केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याचा आरोप करत शेतकरी निराश होऊन परतण्यास सुरुवात झाली आहे. आपण हे आंदोलन आता मागे घेत आहोत आणि त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी पुन्हा आपापल्या घरी परतावे, असे आवाहन शेतकरी नेते टिकैत यांनी केले.

या किसान क्रांती यात्रेला दिल्ली-युपीच्या सीमेवर हिंसक वळण लागले. त्यात आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी युपी आणि दिल्लीच्या पोलिसांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. शेवटी मंगळवारी रात्री उशिरा सुमारे १२.३० वाजता पोलिसांनी बॅरिकेड्स बाजूला केले आणि आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यास परवानगी दिली गेली.

किसान क्रांती यात्रेचे प्रतिनिधी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यादरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा सुद्धा झाली. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बीकेयू प्रमुख नरेश टिकैट यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यानंतर अखेर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा जाहीर केली. दरम्यान किसान घाट येथे फुले वाहून आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे आणि हे सरकार शेतकरीविरोधी आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोप मोदी सरकारवर केला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x