22 February 2025 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

गुजरातमधील बलात्कार प्रकरण, तब्बल ५० हजार यूपी बिहारींचे गुजरातबाहेर पलायन

अहमदाबाद : साबरकांठा येथे एका १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याने गुजरातमध्ये सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर बलात्कारी आरोपी हा बिहारी असल्यामुळे उत्तर भारतीयांविरोधात संपूर्ण गुजरात मध्ये आंदोलन पेटलं आहे. त्यानंतर भेदरलेल्या उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन करण्यास सुरुवात केली असून, आता पर्यंत तब्बल ५० हजारांवरून अधिक युपी-बिहारींनी गुजरातच्या बाहेर पलायन केलं आहे.

चिमुकलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर नेहमीच शांत आणि संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला असून युपी-बिहारच्या कामगारांना लवकरात लवकर गुजरात सोडून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. याबाबतचे अनेक व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर, जवळपास ५०,००० हून अधिक उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याचे वृत्त आहे.

राज्यातील युपी-बिहारींना हाकलून लावण्याची मोहिमच संपूर्ण गुजरातमध्ये सुरू झाली. त्यानंतर या आंदोलनाने मोठ स्वरूप धारण केले असून अनेक ठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांना खूप मारहाण करण्यात आली आहे तसेच अनेकांना शोधून चोप दिला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ४२ गुन्हे दाखल केले आहेत. तर तब्बल ३४२ जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील ६ जिल्ह्यांमध्ये या घटना सर्वाधिक घडत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x