22 February 2025 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

भारतीय लष्कर प्रमुखांच्या विधानानंतर पाकिस्तानच्या लष्कराकडून थेट युद्धाची भाषा

नवी दिल्ली : पाकिस्तान एक अण्वस्त्र संपन्न देश असून आमचं लष्कर कायम युद्धासाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी दिली आहे. आमचं लष्कर युद्धासाठी नेहमीच सज्ज असतं असं विधान करत, भारताच्या उत्तरावर प्रतिक्रिया दिली आहे. कालच भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केल होत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर भारत सरकारने तडकाफडकी न्यूयॉर्कमध्ये होणारी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारत सरकारच्या या निर्णयाचं भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सुद्धा स्वागत केलं. त्याचवेळी त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सज्ज असल्याचं विधान केलं होत.

शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं होत. आता दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे. आपल्यासाठी संवाद आणि दहशतवाद एकाचवेळी शक्य नाही, असं बिपीन रावत पत्रकार परिषदेत म्हणाले होते. पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया पूर्णपणे रोखाव्यात. पाकिस्तानकडून अतिशय क्रूरपणे जम्मू काश्मीरमध्ये ३ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानविरोधात योग्य ती कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे,’ असं बीपीन रावत यांनी म्हटलं होतं. त्यालाच पाकिस्तानकडून थेट युद्धाच्या भाषेत उत्तर आलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x