16 April 2025 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

कोरोना आणि शेतकरी आंदोलनामुळे संघ भाजपासाठी चिंतेत | मोहन भागवतांसह RSS'च्या मोठ्या नेत्यांची बैठक

Uttar Pradesh Assembly Election 2022

नवी दिल्ली, ०४ जून | कोरोना महामारी, शेतकरी आंदोलन, महागाई यासारख्या अनेक मुद्यांवरुन मोदी सरकार सध्या बॅकफूटवर येताना दिसत आहे. त्यामुळे मोदी सरकारची विश्वासार्हतादेखील कमी होत आहे. त्यासोबतच विरोधी पक्षांकडूनही सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर भाजपची मदर विंग असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी एका उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भाजपची विश्वासार्हता कशी वाढवता येईल यावर भर दिला जाणार आहे.

ही बैठक शनिवारी दिल्लीत होणार असून यामध्ये संघातील दहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, दत्तात्रेय होसाबाळे, कृष्णा गोपाळ, सुरेश सोनी आणि भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहे. हे सर्व नेते सध्या दिल्लीत पोहचले असून ते उद्याच्या बैठकीत संदर्भांत विचारमंथन करीत आहे.

या 4 प्रमुख मुद्यांवर होत आहे विचारमंथन:

  1. बंगाल निवडणुकीतील पराभव, राज्यात हिंदूवर होणारे अत्याचार आणि बंगालमध्ये सुरु असलेल्या विचार युद्धांची दिशा काय असेल?
  2. उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेली राजकीय गतिरोध कमी करणे. पंचायत निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला?
  3. कोरोनाकाळात मोदी सरकारची विश्वासार्हता का कमी झाली? सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरले का? केंद्रीय मंत्रिमंडळात बदल केल्याने पक्षाला काय फायदा होईल?
  4. केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा, कित्येक राज्यांत भाजप नेत्यांना गावात प्रवेश दिला जात नाही.

 

News English Summary: The Modi government is currently on the backfoot on many issues like the Corona epidemic, farmers’ agitation and inflation. Therefore, the credibility of the Modi government is also declining. At the same time, it is facing constant criticism from the opposition. In the background, the BJP’s mother wing, the Rashtriya Swayamsevak Sangh, has taken the initiative.

News English Title: Rashtriya Swayamsevak Sangh called meeting over BJP political crisis before Uttar Pradesh Assembly Election 2022 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या