23 February 2025 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं व भोंगळ कारभार जबाबदार - सोनिया गांधी

Sonia Gandhi, PM Narendra Modi, India China

नवी दिल्ली, २३ जून : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक घेतली. भारतीय सीमांवर निर्माण झालेल्या तणावासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. चुकीची धोरणे आणि भोंगळ कारभार सीमेवरील तणावाचे मूळ असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.

सोनिया गांधी म्हणाल्या की, नियंत्रण रेषेवर चीनसोबत तणाव सुरु आहे. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही पण आपली परिपक्व मुत्सद्देगिरी आणि निर्णायक नेतृत्त्व आपल्या प्रादेशिक अखंडतेचं संरक्षण करताना काय केलं जातयं याची माहिती देईल अशी अपेक्षा आहे, असे सोनिया गांधींनी यावेळी सांगितले.

“देश आज आर्थिक संकट आणि महामारीचा सामना करत आहे. यादरम्यान भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीमुळे देशात तणाव आहे. या दोन्ही संकटांसाठी एनडीए सरकारचे चुकीचे निर्णय आणि धोरणं कारणीभूत आहेत” असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधन दरवाढ सुरू असल्यावरून देखील सोनिया गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकार पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Congress President Sonia Gandhi today convened a meeting of the Congress Executive Committee through video conferencing. The Modi government is responsible for the tension on the Indian border. Sonia Gandhi criticized the wrong policies and mismanagement as the root cause of border tensions.

News English Title: Sonia Gandhi criticized the wrong policies and mismanagement as the root cause of border tensions News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SoniaGandhi(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x