17 April 2025 2:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

राष्ट्रीय महामार्गावर 'राष्ट्रीय नागरिकांचा' खिसा रिकामा

मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. तर वांद्रे – वरळी सी लिंकच्या टोलमध्ये थेट दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

नवीन आर्थिक वर्षापासून आधीच पेट्रोल – डिझेलचे दर वाढले असताना राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर ‘राष्ट्रीय नागरिकांचा’ खिसा रिकामा होणार आहे.

मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलदरात दरवर्षी पाच ते सहा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. त्याप्रमाणेच प्रत्येक रस्त्याच्या अंतरानुसार टोलची वाढ ठरवण्यात येते. मोदीसरकारच्या या निर्णयामुळे मुंबई-नाशिक, मुंबई-बेंगळुरू, मुंबई-आग्रा आणि मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांने प्रवास करताना प्रवाशांना सध्याच्या टोल रकमेच्या तुलनेत सहा टक्के रक्कम जास्त द्यावी लागू शकते.

मुळात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे टोलबंदीची घोषणा याच सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केली होती. परंतु प्रत्यक्ष सत्तेत आल्यावर मोदीसरकारने टोल वाढीचा निर्णय घेतला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या