18 April 2025 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

वायएस जगनमोहन रेड्डींच्या मंत्रिमंडळात ५ जातीचे ५ उपमुख्यमंत्री

YS jaganmohan, Chandrababu naidu

अमरावती : आंध्र प्रदेश सरकारमध्ये केवळ १-२ नव्हे, तर तब्बल ५ उपमुख्यमंत्री असणार आहेत. आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. घटनेनुसार उपमुख्यमंत्री या पदाला कोणताही संविधानिक अधिकार नसतो, मात्र स्वतःच्या पक्षातील इतर वजनदार नेते मंडळींना खुश करण्यासाठी हे पद निर्माण गेलं असलं तरी त्याचा वेगळाच प्रयोग सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात केला जात आहे.

याच पदाला आता जातीचा आधार देऊन पक्षातील विविध जातीच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केलं जाणार आहे. त्यात जातीय राजकारणाचा विचार करता एससी, एसटी, बीसी, अल्पसंख्यांक आणि कापू अशा एकूण ५ समाजातील नेतेमंडळींना उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या पुढील म्हणजे २०२४ मधील विधानसभा निवडणुकीची बीज रोवल्याचे म्हटले जात आहे.

त्यामुळे संपूर्ण देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यात तब्बल ५ उपमुख्यमंत्री असतील. चंद्राबाबू नायुडू यांच्या सरकारमध्ये बीसी आणि कापू अशा २ समाजातील उपमुख्यमंत्री होते. वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारमधील २५ मंत्री येत्या शनिवारी शपथग्रहण करतील. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, अडीच वर्षांनी मंत्रिमंडळाची फेररचना सुद्धा केली जाईल. प्रत्येक आमदाराने आपले काम चोख करावं, प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे गांभिर्याने पाहावं. कारण सर्वांची नजर आपल्या कामगिरीकडे आहे. आपल्या वायएसआर काँग्रेसचं सरकार आणि आधीचं चंद्राबाबूंचं सरकार यातील फरक लोकांना दाखवून द्यायला हवं.” असेही वायएस जगनमोहन रेड्डी म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandra Babu Naidu(15)#YSR Congress(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या