23 February 2025 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भारत-चीन वादावर केंद्र सरकारची भूमिका काय? - सोनिया गांधी

India China, ladakh, Sonia Gandhi, PM Narendra Modi

नवी दिल्ली, १७ जून : जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखमधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्व मुख्यमंत्र्यांसह शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

चीन आणि भारतीय सैन्य दलात झालेल्या संघर्षावर यावेळी पंतप्रधानांनी थोडक्यात भाष्य केलं. ‘भारताने कधीच कोणावर आक्रमण केलं नाही. तसंच भारत जशाचं तसं उत्तर देण्यास सक्षम असून जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं मोदी म्हणाले. दरम्यान, पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे ३५ जवान मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांनी आता पुढे येऊन जनतेला संबोधित केलं पाहिजे. चीनने देशाचा भाग हडपला कसा यावर बोललं पाहिजे, आपेल २० सैन्य शहीद का झाले, तिकडची सध्याची परिस्थिती काय आहे? असे विविध प्रश्न आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मांडले आहेत.

आपले आणखी काही सैन्य बेपत्ता आहेत का? आणखी किती सैन्य आणि अधिकाऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे?नक्की कोणता भाग चीनने व्यापला आहे? या सर्व प्रकरणावर सरकारचे नियोजन कसे आहे? असे सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केले आहेत. शिवाय, सैन्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस उभी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

 

News English Summary: Twenty Indian soldiers have been martyred in East Ladakh. Therefore, the Prime Minister of India should now come forward and address the people. We have to talk about how China grabbed part of the country, why were 20 soldiers martyred, what is the current situation there? Such various questions have been raised today by the interim president of the Congress, Sonia Gandhi.

News English Title: Twenty Indian soldiers have been martyred in East Ladakh Sonia gandhi asked question to PM Narendra Modi News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SoniaGandhi(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x