15 April 2025 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - देवेंद्र फडणवीस

Opposition Leader Devendra Fadnavis, Kolhapur, CM Uddhav Thackeray

कोल्हापूर: एका विवाह समारंभाच्यानिमित्ताने रविवारी फडणवीस कोल्हापुरात आले होते. त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री ते म्हणाले,आज शेतकरी अडचणीत आहे. त्याला तातडीने मदत देण्याची गरज होती. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करतो अशी घोषणा करणाऱ्यांनी ‘यु टर्न’ घेतला आहे.

आज अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असताना त्यांना ती दिली गेली नाही. सप्टेंबर २०१९ पर्यंतची मुदत घातल्याने अनेकजण यापासून वंचित राहणार आहेत. कोल्हापूर , सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या सर्व बाबींविरोधात भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे.

सरकारची कर्जमाफीची उधारीची घोषणा आहे. आजच्या अडचणीतील शेतकऱ्यांना थेट मदत होणं गरजेचं होतं. त्याचबरोर सर्व प्रकारची मध्यम-दीर्घ मुदतीची सर्व कर्जे माफ केल्यासच सातबारा कोरा होतो. यापूर्वी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय आमच्या सरकारनेच घेतला होता. त्यामुळे कोल्हापूरच्या भागात या नव्या कर्जमाफीचा उपयोग होणार नाही. उलट अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी योजनाचा फायदा मिळाला पाहिजे असं फडणवीस म्हणाले.

राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. राज्याची अर्थव्यवस्था १५.८ टक्के आहे. सकल उत्पन्नात राज्याची अवस्था चांगली आहे. सकल उत्पनाच्या १५.८ टक्के इतके कर्ज आहे, २६ टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांनाना उद्धव ठाकरेंनी असा शब्द दिला होता का की, दोन्ही काँग्रेसच्या जीवावर सत्ता स्थापन करणार? असा बोचरा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

Web Title:  Opposition Leader Devendra Fadnavis Press Conference at Kolhapur.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या