आदित्य ठाकरेंकडे 'जन आशीर्वाद' यात्रेसाठी वेळ; पण तिवरे धरणातील बाधितांना भेटण्यास वेळ नाही?

मुंबई: चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता. मात्र सत्तेत विराजमान असून आणि स्वतःला कोकणचे कैवारी समजणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येथे फिरकलेच नाहीत.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून थेट सत्तेत महत्वाच्या पदावर विराजमान करण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शहं देण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे वृत्त आहे. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून एकप्रकारे आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात सत्तेत विराजमान करण्याच्या योजना शिवसेनेने आखल्या आहेत.
दरम्यान फडणवीसांची ‘विकास यात्रा’ १ ऑगस्टपासून काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती आणि कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी तसेच ५ वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच घाईघाईत आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात करतील. येत्या शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल. कोल्हापूरातील अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या यात्रेला सुरुवात होईल. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगलं मतदान झाल्याने मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं शिवसेनेकडे वळवण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार असल्याचे समजते. सध्या शिवसेना, भारतीय जनता पक्षामध्ये सगळं काही आलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. परंतु तरी देखील शिवसेना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाच्या मनस्थितीत नाही. २०१४चा अनुभव गाठीशी असल्याने आणि भाजपावर पूर्ण विश्वास नसल्याने भाजप थेट निवडणुकीच्या वेळी युती तोडूदेखील शकतो हे माहित असल्याने शिवसेना हा धोका टाळण्यासाठी कामाला लागली आहे.
त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर ‘आशीर्वाद यात्रा’ काढायला वेळ आहे, मात्र अनेक निरपराधांचे बळी जाऊन देखील उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे येथे फिरकले देखील नाहीत आणि त्यामुळे समाज माध्यमांवर आत्तापासूनच त्यांच्या या यात्रेवर टीका करण्यात येते आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल