18 April 2025 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

सत्ता आपल्या चुकीमुळे नाही तर शिवसेनेच्या गद्दारीमुळे गेली: खा. नारायण राणे

Chief Minister Uddhav Thackeray, BJP MP Narayan Rane

सावंतवाडी : स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणी वेळी भारताच्या सीमावर्ती भागात आश्रय घेतलेल्या अत्याचारग्रस्त लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत देश धर्मनिरपेक्ष आहे, हे पटवून देणारे नागरिकता विधेयक दोन्ही सभागृहांत संमत झाले. मात्र, या वेळी शिवसेनेची भूमिका ही धरसोड राहिली. हिंदुत्ववादी म्हणविणा-या शिवसेनेचा खरा मुखवटा यावेळी उघड झाला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केली. खरे म्हणजे, शिवसेना हा मुखवटा नसलेला पक्ष आहे, असेही ते म्हणाले.

सावंतवाडी येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना खा. नारायण राणे बोलत होते. केवळ सत्तेसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. प्रशासनाची व जनतेच्या प्रश्नांची कोणतीही जाण नसलेला, अबोल मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला मिळाला, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांना प्रशासनाची कोणतीही जाण नाही. राज्याच्या व जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत आणि विकासाला खीळ बसेल, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष अशा वेगवेगळ्या विचारधारा असणारे हे तिन्ही पक्ष असल्यामुळे त्यांचे परस्परांशी जास्त काळ पटणार नाही. तसेच काँग्रेसने जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केली आहे, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मान्य नाही. त्यामुळे हे तीन पक्ष जास्त काळ एकत्र राहू शकणार नाहीत आणि हे सरकार सहा महिन्यांत कोसळेल, असं नारायण राणे म्हणाले आहेत. राज्यातील सत्ता ही आपल्या चुकीमुळे नाही, तर मित्रपक्षांच्या गद्दारीमुळे गेली आहे. त्यामुळे भविष्यात स्वाभिमान व भाजप यांच्या एकत्रित येण्यामुळे वाढलेली ताकद एकदिलाने काम करून व पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार निष्ठा व प्रामाणिकपणे काम करून जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका भाजपचेच कार्यकर्ते जिंकतील व भविष्यात आमदार-खासदार व पालकमंत्री हे भाजपचेच असतील, असा विश्वास खासदार राणे यांनी व्यक्त केला.

 

Web Title:  BJP MP narayan Rane criticized Chief Minister Uddhav Thackeray.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या