20 April 2025 10:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

तिवरे धरणाचे ठेकेदार सेना आमदार सदानंद चव्हाणांविरुद्ध गुन्हा दाखल करा, विरोधकांची मागणी

Shivsena, Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Tivare Dam Scam, Shivsena party

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. हे धरण बांधलेली खेमराज कन्ट्रक्शन कंपनी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. महत्त्वाचं म्हणजे खेमराज कन्ट्रशन कंपनी चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि त्यांच्या बंधूची आहे. धरणाला लागलेल्या गळतीप्रकरणी आता खेमराज कन्ट्रक्शन कंपनी जवाबदार असल्याचे आरोप होत आहे.

पण हे सर्व आरोप आमदार सदानंद चव्हाण यांनी फेटाळून लावलेत. तिवरे धरण मातीचे बांधण्यात आले होते. तब्बल २० वर्षानंतर धरण बांधलेल्या कंपनीला कसं काय दोषी धरलं जावू शकतं, असा सवाल सदानंद चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. शिवाय आपण लोकप्रतिनिधी असल्यानं आपल्याला गुंतवलं जात असल्याचा आरोप सदानंद चव्हाण यांनी केला. खेमराज कनस्ट्रकशन यात दोषी नसल्याचा दावा यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी केला. शिवाय अधिकाऱ्यांनी या धरणाच्या डागडुजीसंदर्भात योग्य ती पावले उचलायला हवी होती असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण हे तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच धरण फुटल्यामुळे झालेले मृत्यू हे सरकारच्या अनास्थेचे बळी असून सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं ओसंडून वाहणाऱ्या तिवरे धरणाला भगदाड पडून ते फुटले. यामुळे धरणाच्या परिसरातील गावे पाण्याखाली गेल्याने हाहाकार माजला आहे. या दुर्घटनेत १३ घरे पाण्याखाली गेली तर २४ जण बेपत्ता आहेत.

दरम्यान शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळे आमदारांसह संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राजीनामा द्यावा असेही वडेट्टीवार म्हणाले. तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकरयांनी तक्रार केली होती, अशी कबुली गिरीष महाजन यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेशही गिरीष महाजन यांनी दिल्याचे सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या