महत्वाच्या बातम्या
-
माझं देखील वृत्तपत्र आहे | लवकरच चॅनल देखील येईल | नारायण राणेंचा सेनेला थेट इशारा
नारायण राणेंना भाजपाकडून केंद्रीयमंत्री पद दिल्या गेल्याने, यावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालेली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर या वादात अधिकच भर पडली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक मोठा खुलासा केल्याचं दिसून आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुलांमुळेच नारायण राणेंचं नुकसान | त्यांची मुलं उठसूट इतरांचे बाप काढतात, तुम्ही काय बिनबापाचे आहात काय?
मुख्यमंत्री ठाकरे यांना धमी देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कायद्यावे कारवाई केली. राणे यांच्यावरील कारवाई म्हणजे घटनाबाह्य असल्याचे तारे भाजप नेते तोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री असोत, त्यांचा जाहीर उपमर्द कोणालाच नाही. राणे हा अपराध वारंवार करती राहिले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा कोणाला गुन्हा वाटत असेल तर ते भारतीय संविधानास कुचकामी ठरवत आहे. असे टीकास्त्र संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र रोखठोकमधून सोडले आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे - नारायण राणे
जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेली, असा घणाघात करत केंद्रीय लघू आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. ते कणकवलीत बोलत होते. तसेच एका दिवसात स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे, अशी टीका राष्ट्रवादीवर केली.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीतून फोन करून कोणाच्या कानाखाली मारायची नाही असं सांगितलंय, पण बाकी अवयव आहेत ना - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. माझ्या नेत्यांनी दिल्लीहून परवा फोन करून कोणाच्या कानाखाली नाही मारायचे, असे सांगितले. मात्र, मी कानाच्या खाली मारणार नाही. बाकी अवयव आहेत ना ? कोर्टानेही माझ्याकडून लिहून घेतल्याचे नारायण राणेंनी कार्यक्रमात सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
कणकवली | नारायण राणेंच्या हाताला रेलिंगचा करंट लागताच त्यांनी इतरांना सावध केले | राणे सुखरूप
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून पुन्हा एकदा आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केलीय. काल रत्नागिरी जिल्ह्यातून राणेंची ही यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली आहे. यावेळी ठिकठिकाणी राणे यांचं ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं जात आहे. कणकवलीमध्येही राणे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, त्यावेळी एक ठिकाणी नारायण राणेंना लाईटचा शॉक लागल्याचं पाहायला मिळालं. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला धक्का | मोदी सरकारकडून कोंकण रेल्वेचे खाजगीकरण ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परवाच 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपक्रमाची घोषणा केली आहे या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
गडकरींचं मंत्रालय निधी देतंय | सूक्ष्म आणि लहान मंत्रालयातून काय निधी मिळणार? | ते पूर्वीचं अवघड खातं
करोना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी करोना त्याच्या नियमावली संदर्भात प्रशासनाला काही सूचना केल्या. यावेळी त्यानी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला. त्यांच्या मंत्रालयाकडून काय निधी मिळणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार, GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे - उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारणार | नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रेत ग्वाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी ग्वाही दिली.
4 वर्षांपूर्वी -
तो वरुण सरदेसाई येऊ देच, आता आला तर परत नाही जाणार | नारायण राणेंचं धमकी सत्र सुरूच
युवासेना सचिव वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे माघारी जाणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला. ते रत्नागिरीत भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत बोलत होते. नारायण राणेंच्या अटक नाट्याच्या तिसऱ्या दिवशी भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघाली. आज राणे रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गात जाऊन या यात्रेचा समारोप करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोकणातील राजकीय संघर्षात 'राणे – नाईक' कुटुंबांमधील वैर नेमकं काय होतं? | काय आहे इतिहास
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील वाद पार विकोपाला पोहोचल्याचे आपण सगळेच बघत आहोत. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही | पण उद्धव ठाकरेंवर विनाकारण टीका केल्यास विरोध करणार - आ. वैभव नाईक
सकाळी नियोजित वेळेत मंत्री नारायण राणे यांचे विमानतळावर आगमन झाले. अकरा वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि तेथून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. त्यानंतर माजी खासदार लोकनेते स्व. शामराव पेजे तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन ते गोळप (ता. रत्नागिरी) येथे आंबा व काजू उत्पादकांच्या बैठकीसाठी रवाना झाले.
4 वर्षांपूर्वी -
श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंना भर संसारातून कायमचे कोणी उठवले? - शिवसेना
महाराष्ट्राला ठाकरे आणि राणे संघर्ष तसा नवा नाही. आरोप प्रत्यारोप आणि जहरी टीकेपर्यंत असलेल्या या युद्धानं आता नवं रूप धारण केलं आहे. या दोघांमधला सामना आणि एकमेकांवरील प्रहार आता थेट कोर्ट कचेऱ्यांमध्ये रंगणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकनाट्यामुळे शिवसेना विरुद्ध राणेंच्या संघर्षानं नवं वळण घेतलं आहे. आतापर्यंत भाषणांमधून टीका आणि रस्त्यावरचा राडा एवढ्यापुरती मर्यादित असलेली लढाई आता कोर्ट कचेऱ्यांमध्ये पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सेना भवनजवळच्या राड्यातील भाजप कार्यकर्ते मावळे, तर जुहूच्या राड्यातील शिवसैनिक गुंड? | राष्ट्रपती राजवटीची मागणी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जमीन मिळाल्यावर त्यांचं नक्की मत काय या सगळ्यावर याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून मोठं विधान केलं आहे. या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राणेंना न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर | प्रसाद लाड यांनी राणेंना कोठडीत पाठविल्याचे माध्यमांना सांगितले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाचा अपमान केलेला शिवसैनिकांना चालतो का? बाळासाहेबांनी तरी हे सहन केले असते का? असा प्रश्न विचारत आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे नितेश राणे कणकवलीत बोलताना म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | नारायण राणे जेवत होते, पण पोलिसांनी ना जेवणाचं ताट खेचलं, ना धक्काबुक्की | प्रसाद लाड यांचा माध्यमांकडे बनाव?
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अटक होताच नारायण राणेंची प्रकृती बिघडली | रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मला मारण्याची भाषा हे संबधित पोलीस करत आहेत | आ. नितेश राणेंचा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे. पुणे, रायगड आणि नाशिक येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्र्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. पुण्यातील चतुश्रुगी पोलिस ठाण्याचे एक पथक रायगडमधील चिपळूणला रवाना झाले आहे. असे सांगितले जात आहे की ही टीम नारायण राणे यांना अटक करणार आहे. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये सहभागी असलेले नारायण राणे सोमवारपासून येथेच आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50