17 April 2025 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्वाचं - मुख्यमंत्री

Aurangabad, development work, CM Uddhav Thackeray

औरंगाबाद, १२ डिसेंबर: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे (Chief Minister Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत (Aurangabad Water Supply Scheme). यादरम्यान त्यांनी औरंगाबादचं प्रत्येक घर बदलणारवाऱ्या ‘पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन केलं. गरवारे स्टेडियम वरील भव्य शामियान्यात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या योजनेअंतर्गत औरंगाबादकरांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेने औरंगाबादेतील प्रत्येक घरात पुरेसं पाणी पोहोचेल असं आश्वासन देण्यात आलं आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केले.

“निवडणुका आल्या म्हणून मी विकास कामे करायला आलो नाही. कोविडमुळे ही कामे रखडली होती. आता थोडा प्रार्दुभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता कामं वेगानं होतील. महामार्गांचं काम पूर्ण झालं तर औरंगाबादचा विकास अधिक वेगाने होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना रखडली होती. कुणामुळे रखडली होती हे माहीत नाही. पण माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्वाचं आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

पाणी पुरवठा योजनेवर भारतीय जनता पक्षाचा आक्षेप:
या योजनेवर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला आहे. 1680 कोटीतले 630 कोटी रुपये औरंगाबाद महापालिका भरु शकणार नाही. त्यामुळे ही योजना पूर्णत्त्वाला जाऊ शकणार नाही, अशी भीती भाजपने व्यक्त केली आहे. महापालिकेच्या वाट्याचे 630 कोटी राज्य सरकारने भरावेत अशी मागणी भाजपने केली आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे जम्बो कामाचं उद्घाटन करत आहेत. त्यामुळे शिवसेना महापालिका निवडणुकांची रंगीत तालीम सुरु करत अल्यासाची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray is visiting Aurangabad today (Aurangabad Water Supply Scheme). Meanwhile, he inaugurated a water supply scheme that will replace every house in Aurangabad. The inaugural function was held in a grand pavilion at Garware Stadium. Under this scheme, water will be available to Aurangabad residents 24 hours a day. The scheme promises to provide adequate water to every household in Aurangabad.

News English Title: Aurangabad development work says CM Uddhav Thackeray news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या