20 April 2025 8:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

भाजप नेत्यांना किती जागा निवडून येणार त्याचा अंदाज अचूक येतो; पण पुराचा नाही ? राज ठाकरे

Raj Thackeray, MNS, BJP, Sangali Flood, Kolhapur Flood, , Post pond assembly election 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.

सध्याच्या परिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांची घरदार आयुष्यच नष्ट झाली आहेत आणि ती परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी ६ महिने लागतील. तसेच पूर जरी ओसरला तरी मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली आणि विषयाचे गांभीर्य प्रसार माध्यमांच्या समोर मांडले. अशा परिस्थितीत तिथली लोकं अडकली असताना त्यांच्याकडे मत जाऊन मागायची का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या याच विषयाला अनुसरून सुरु असलेल्या मार्केटिंग आणि राजकारणाचा देखील त्यांनी समाचार घेतला. विशेष म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ‘सरकारला हा पूर परिस्थितीचा अंदाज आला नव्हता आणि त्यामुळे मदत पोहोचण्यास सुरुवात झाल्याचे’, त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हटले होते. नेमका त्याच विषयाचा धागा संदर्भ घेत राज ठाकरे म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटलांना पूर परिस्थितीचा अंदाज येत नाही, मात्र कोणत्याही निवडणुकीत किती जागा निवडून येणार याचा त्यांना अचूक अंदाज येतो’ असा टोला लगावला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या