22 February 2025 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

भाजप नेत्यांना किती जागा निवडून येणार त्याचा अंदाज अचूक येतो; पण पुराचा नाही ? राज ठाकरे

Raj Thackeray, MNS, BJP, Sangali Flood, Kolhapur Flood, , Post pond assembly election 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.

सध्याच्या परिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांची घरदार आयुष्यच नष्ट झाली आहेत आणि ती परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी ६ महिने लागतील. तसेच पूर जरी ओसरला तरी मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली आणि विषयाचे गांभीर्य प्रसार माध्यमांच्या समोर मांडले. अशा परिस्थितीत तिथली लोकं अडकली असताना त्यांच्याकडे मत जाऊन मागायची का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या याच विषयाला अनुसरून सुरु असलेल्या मार्केटिंग आणि राजकारणाचा देखील त्यांनी समाचार घेतला. विशेष म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ‘सरकारला हा पूर परिस्थितीचा अंदाज आला नव्हता आणि त्यामुळे मदत पोहोचण्यास सुरुवात झाल्याचे’, त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हटले होते. नेमका त्याच विषयाचा धागा संदर्भ घेत राज ठाकरे म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटलांना पूर परिस्थितीचा अंदाज येत नाही, मात्र कोणत्याही निवडणुकीत किती जागा निवडून येणार याचा त्यांना अचूक अंदाज येतो’ असा टोला लगावला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x