22 February 2025 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे: फ्रान्सिस दिब्रेटो

CM Uddhav Thackeray, Marathi sahitya sammelan chief Francis Dibrito, Marathi language abhijat bhasha

उस्मानाबाद: देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शुक्रवारी एल्गार पुकारला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरून अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचिंग), विरोधी मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकारांविरोधात सारस्वतांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. ‘देशाला वेठीस धरले जात आहे,’ अशी सडकून टीका साहित्यिकांनी केली.

“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठी भाषेचा आग्रह धरणारे आहेत. त्यांना सांगा हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा ही मंडळी तुमचं ऐकणार नाहीत.” असंही संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी स्पष्ट केलं.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर आम्ही मुळीच शांत बसणार नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं? तसंच दाभोलकर, गौरी लंकेश यांना ठार करण्यात आलं ही कोणती भारतीय संस्कृती आहे? असे प्रश्न उपस्थित करत ९३ व्या अखिल भारतीय संमेलानाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीवर भाष्य केलं आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

अध्यक्षीय भाषणात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधानातील मूल्यांची पायमल्ली, पर्यावरणाचा ऱ्हास, मातृभाषेतून शिक्षण, प्रकाशन व्यवसाय अशा अनेक मुद्यांना स्पर्श केला. तरुणांना काही काळ फसवता येईल, त्यांची दिशाभूल करता येईल. मात्र, ही धुंदीही हळूहळू उतरते. दुसऱ्यांच्या द्वेषावर आपले जीवन, राजकारण अवलंबून असते तेव्हा जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. सध्या देशासमोर आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पर्यावरणाचा ºहास हे प्रश्न आहेत. प्रगती करताना मूल्यांचा विसर पडता कामा नये, याकडे दिब्रिटो यांनी लक्ष वेधले.

 

Web Title:  CM Uddhav Thackeray has given promise to give Marathi language abhijat bhasha position says Marathi Sahitya Sammelan chief Francis Dibrito .

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x