16 April 2025 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

रिपोर्टनुसार फडणवीस सरकारच्या काळातच सर्वाधिक महिला अत्याचार

atrocities against women, BJP, Fadnavis Govt, Maha Vikas Aghadi

मुंबई, २७ मार्च: सध्या महिला अत्याचारावरून भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत असले तरी सर्वाधिक महिला अत्याचार हे फडणवीस सरकारच्या काळात आसल्याच उघड झालं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचे दावे अधिकृत आकडेवारीतून खोटे ठरत आहेत.

भाजप सरकारच्या तुलनेत महाविकासआघाडी सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण हजारोंच्या संख्येने घटले आहे. गतवर्षीचा आढावा घेणाऱ्या यंदा प्रकाशित झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात महिला व बालकांसंदर्भात ही बाब समोर आली होती.

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होण्याआधी फडणवीस सरकारच्या काळात 2018 साली महिला अत्याचाराचे 35, 501 तर 2019 साली 37,112 इतके गुन्हे नोंदवण्यात आले होते. महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर 2020 साली मात्र महिला अत्याचाराच्या प्रमाणात 10 हजारांपेक्षा जास्त संख्येने घट झाली असून महिला अत्याचाराच्या 26,586 इतक्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच 2018 मध्ये बालकांवरील अत्याचाराचे 15,544 तर 2019 मध्ये 17,517 गुन्हे नोंद झाले होते. 2020 साली मात्र बालकांवरील अत्याचाराचे हे प्रमाण तब्बल 6 हजारांनी घटून बालकांवरील अत्याचाराच्या 11,154 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचा वाढता आलेख महाविकासआघाडी सरकारच्या काळात हजारोंच्या संख्येने घटल्याची बाब यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली होती. गुन्हे अन्वेषण विभागाच्या आधारावर आर्थिक पाहणी अहवालात ही आकडेवारी सादर करण्यात आली होती.

तत्पूर्वी, नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरोने देशाच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा गुन्हेगारी २०१६चा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्या वर्षात देशात महिला अत्याचाराच्या एकूण तीन लाख ३८ हजार ९५४ घटना घडल्या होत्या. २०१५’च्या तुलनेत २०१६ मध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारासागत गुन्ह्यांत तीन टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता आहे. विनयभंग व छेडछाडीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य त्यावर्षी देखील पहिले, अपहरणाच्या गुन्ह्यात दुसरे आणि बलात्काराच्या गुन्ह्यात तिसरे असल्याचे समोर आले होते.

देशात २०१६ बलात्काराच्या ३८ हजार ९४७ घटना घडल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक घटना मध्य प्रदेश (चार हजार ८८२), उत्तर प्रदेश (चार हजार ८१६) आणि महाराष्ट्र (चार हजार १८९) या राज्यात घडल्या होत्या.

 

News English Summary: Though BJP leaders are currently blaming the Mahavikas Aghadi government for the atrocities against women, it has been revealed that most of the atrocities against women took place during the Fadnavis government. Therefore, the claims of BJP leaders are being falsified by official statistics.

News English Title: Compared to the BJP government the number of atrocities against women and children has decreased by thousands during the Maha Vikas Aghadi government news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या