22 February 2025 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
x

संभाजीनगर: ३ दशकानंतर सुचलं? आता फक्त विकासकामांवरच बोलेन: आदित्य ठाकरे

Environment Minister Aaditya Thackeray, Sambhajinagar, Aurangabad

औरंगाबाद: काल औरंगाबाद महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीत लढली जाणार हे वृत्त पसरताच शिवसैनिकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना तातडीने औरंगाबादला धाडण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील औरंगाबादच्या दौऱ्यावर असल्याने शिवसेनेत धावपळ वाढली आहे आणि त्याच मुख्य कारण म्हणजे मनसेने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर कारण्यासाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे.

१९८८ पासून औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लिम राजकारण करत हिंद्त्वाच्या अजेंड्यावर महाराष्ट्रभर पसरलेली शिवसेना केंदात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेत बसून देखील संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा मार्गी लावला नाही. याच मुद्यावर ३ दशक केवळ राजकरण करत स्वतःची घरं भरण्याचा कार्यक्रमाचं सुरु ठेवला असं आज स्थानिक लोकच बोलू लागले आहेत. साधारण दीड-दोन वर्षांपूर्वी कचराकोंडीमुळे दंगल उसळणारं पहिलं शहर म्हणजे औरंगाबाद अशी ओळख देखील झाली होती. शहरातील अस्वच्छता आणि मूलभूत पायाभूत सुविधांचा अनेक वर्ष बट्याबोळ झाल्याचं पाहायला मिळतं.

मात्र सध्या संभाजीनगरमध्ये हिंदुत्वावरून मनसे आक्रमक होताच आदित्य ठाकरे यांनी औरंबादमध्ये धाव घेतली आहे. यावेळी विमानतळावर त्यांचं आगमन होताच प्रसार माध्यमांनी त्यांना या विषयवार बोलतं करण्याच्या प्रयत्न करताच त्यांनी, आज निवडणुकीवर, राजकारणावर बोलणार नाही, तर फक्त विकासकामांवरच बोलेन, असं उत्तर देत मूळ प्रश्नाला बगल दिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे तब्बल ३ दशकं केवळ संभाजीनगर नामकरणावरून केवळ राजकारण करणाऱ्या शिवसेनेला आज अचानक विकासाची उपरती झाली आहे हे विशेष म्हणावं लागेल.

पुढे पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले, ‘ऑरिक सिटीत अनेक उद्योग येऊ पाहात आहेत. हे काम अजून पुढे वाढतच जाईल. स्थानिकांना रोजगार मिळेल. राज्याच्या महसूलात वाढ होईल. सायकल ट्रॅक पाहून आनंद झाला. पोलिस हौसिंग, सार्वजनिक स्वच्छतागृहावर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या असून त्यांच्या प्रकल्प नियोजनात या बाबी आहेत.’

 

Web Title: Envirinment Minister Aaditya Thackeray talked on Sambhajinagar Issue.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x