22 February 2025 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा
x

मराठवाडा: दुष्काळाचा पहिला बळी; गळणारे पाणी भरताना महिलेचा टँकरखाली मृत्यू

औरंगाबाद : राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे आणि संपूर्ण ग्रामीण भाग त्यात संकटात सापडला आहे. त्यात मराठवाड्यात परिस्थिती अतिशय भीषण असून अनेक गावांमध्ये तब्बल १५ ते २० दिवसांनी पाण्याचा टँकर येत असल्याने अनेक दुर्घटना घडण्यास सुरुवात झाली आहे. गावात पाण्याचा टँकर आला की, पाणी स्थानिकांची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते आणि त्यातून भांडणण आणि मारामाऱ्या होण्याइतपत परिस्थिती भयाण झाली आहे.

दुर्दैवाने तसाच काहीसा प्रकार काल रात्री फुलंब्री तालुक्यातील निमखेड जोशी वस्तीवर आलेल्या अशाच एका पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्याने गावात सुद्धा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गावात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाण्याचा टँकर आला होता. दरम्यान, त्या टॅंकरचा नळ बंद होता, परंतु टँकरमधून पाणी खाली गळत होते असं जमलेल्यांना दिसत होतं. दरम्यान, या महिलेने ते खाली गळणारे पाणी हंड्यात भरण्यास सुरुवात केली. परंतु, पाणी खाली गळत असल्याने जमिन थोडी भुसभुशीत झाल्याने त्यात टँकरचे चाक मातीत दबली गेली आणि त्यादरम्यान सदर महिला त्या चाकाखाली आली. भरलेल्या पाण्याचा एकूण लोड आणि त्यात टँकरचे वजन यामुळे क्षणात त्या महिलेच्या मृत्यू झाला. त्यामुळे दुष्काळाने परिस्थिती किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x