21 April 2025 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कृष्णकुंजवर भेटीगाठी सुरु

MNS, Raj Thackeray, Congress, Manikrao Thakare, Loksabha Election 2019, Maharashtra State assembly election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः शरद पवार प्रयत्नशील असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी त्याला तीव्र विरोध केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी थेट कृष्णकुंज गाठायला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ३ जागा सोडणार, आघाडीसोबत लोकसभा निवडणुका लढणार अशी चर्चा सुरु झाली होती. यावेळी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेली भूमिका आणि त्याचा उत्तर प्रदेश, मुंबईत होणारा परिणाम या कारणांमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांनी तीव्र विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी निवडणुकच लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने यावर पडदा पडला होता. परंतु, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सभा घेतल्या होत्या. या सभा ‘लाव रे तो व्हिडिओ’ द्वारे गाजल्याही होत्या.

मात्र उत्तर प्रदेशात निकालाअंती तिथल्या मतदाराने काँग्रेस, सपा आणि बसपाच्या स्पष्ट नाकारल्याने, आज उगीच मनसे आणि राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांच्या विषयाचा बाऊ केल्याचे त्यांना वाटू लागले असावे. तसेच ना अल्पसंख्यांक, ना हिंदू, ना बौद्ध समाज सोबत राहिल्याने काँग्रेसला राज्यात मतदार उरलेला नाही असंच चित्र आहे. त्यात मनसेकडे मराठी मतदार आणि मोदी विरोधामुळे अल्पसंख्यांक देखील वर्ग होऊ शकतात, तसेच राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी लोकं तरी जमतील, मात्र राज्यातील नेत्यांना ऐकण्यासाठी देखील लोकं जमणार नाहीत आणि त्यामुळे मनसेशिवाय काँग्रेसकडे पर्याय नाही अशीच सध्याची गत झाली आहे.

दरम्यान काही महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न लोकसभेला सपाटून मार खाल्ल्याने काँग्रेसकडून सुरु झाले आहेत. नुकत्याच झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत हा सूर आळवला गेला होता. तसेच काँग्रेसच्या उमेदवारांना मारक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. याचेच एक पाऊल म्हणून आजच्या माणिकराव ठाकरे यांच्या कृष्णकुंज भेटीकडे पाहिले जात आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या