22 February 2025 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा नाणार प्रकल्पाविरोधात विराट मोर्चा

सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरीमुळे या प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यासाठी देवगड तालुक्यातील पंधरा गावे कणकवली तालुक्यातील दोन गावे प्रकल्पबाधित होणार आहेत.’नाणार रिफायनरी प्रकल्प हा कोकणचा नाश करणारा आहे, तसेच या प्रकल्पामुळे कोकणच्या निसर्गाला सुद्धा भविष्यात धोका निर्माण होणार आहे असं स्थानिकांच ठाम मत आहे.

त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात निघालेला या मोर्चाला हजारो स्थानिक गावकरी आणि प्रकल्प बाधित हजर होते. अगदी देवगड पासून ते राजापूरपर्यंतची लोकं या मोर्चात सामील झाली होती. या मोर्चाची सुरवात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयापासून झाली आणि हा मोर्चा थेट तहसीलदार वनिता पाटील यांच्या कार्यालयापर्यंत गेला.

या विनाशकारी प्रकल्पाने राजापूर देवगड कणकवली पर्यंत पाय पसरले असून त्यामुळे हजारो लोकं बाधित तर होणारच आहेतच, परंतु भविष्यात कोकणच्या निसर्गालासुद्धा मोठी हानी होणार असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले. आजचा मोर्चा हा शांततेत निघालेला शेवटचा मोर्चा असून या पूढे शासनाला लोकांच्या भावना आणि विरोध कळत नसेल तर यापुढे आम्ही यापुढे कायदा हातात घेण्यास सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. मग तुम्ही पोलीस बळ वापरा, आर्मी आणा; पण आमची ताकद आम्ही तुम्हाला सर्वजण मिळून सरकारला आमची ताकद दाखवून देऊ,” असा थेट इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x