20 April 2025 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा
x

धक्कादायक! फडणवीस सरकारच्या काळात राज्यात जातीय तणाव वाढला: पोलीस खात्याचा अहवाल

Hindu Muslim Riots, dalit riots, CM Devendra Fadanvis, Hindu Violence

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जातीय तणावाचा धक्कादायक अहवाल पोलीसांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारची गोची झाल्याचं म्हटलं जातं आहे आणि विशेष म्हणजे स्वतः फडणवीस यांच्याकडेच गृहखातं असल्यामुळे अडचणीत अधिकच भर पडली आहे. दरम्यान पोलिसांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणाव वाढलं असल्याच समोर आलं आहे. त्यानुसार हिंदु-मुस्लिम तणावाची जागा मागील ५ वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतली असल्याचं दिसत आहे.

त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील भीषण परिस्थितीचं वास्तव उघड्यावर आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यात पोलीस खात्याने निवडणूक आयोगाला थेट राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात एक सादरीकरणच केल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये राज्यातील हिंदू-मुस्लीम तणावाची जागा मागील ५ वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगाला दिला.

या अहवालानुसार, हिंदू-मुस्लीम धर्मियांतील तणावासाठी राज्यातील ८ जिल्हे संवेदनशील आहेत. तर त्या तुलनेत सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव असलेले १४ जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदु धर्मियातील तणावाच्या घटनांसाठी संवेदशील आहेत. तर मागील काही वर्षात राज्यात हिंदु-मुस्लिम तणावापेक्षा सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव राज्यात वाढला आहे.

त्यामुळे सर्वत्र सुशासनाचा जागावाज करणारं फडणवीस सरकार तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस खात्यानेच हा अहवाल दिल्याने विरोधकांच्या हाती आयतंच काहीतरी चालून आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या