19 April 2025 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-एनसीपी सेनेला पाठिंबा देऊ शकतात: पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan, BJP, Shivsena

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार मतदाराने भाजप-शिवसेना युतीला कारभारासाठी आणखी ५ वर्षे दिली आहेत. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची एकत्र येण्याची शक्यता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा जागांपैकी भाजपाने १०५ जागा जिंकल्या आहेत. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या आहेत. अशा प्रकारे भाजप-शिवसेना युतीला एकूण १६१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ५४ तर कॉंग्रेसने ४३ जागा जिंकल्या आहेत.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १२२ जागा, शिवसेनेला ६३, कॉंग्रेसला ४२ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. २०१४मधील विधानसभा निवडणुक भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. मात्र, निकालांनंतर शिवसेना भाजपप्रणीत सरकारमध्ये सामील झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, निकालांनंतर महाराष्ट्रातही पुढील सरकार स्थापन करण्याची एक’रंजक बातमी समोर येऊ शकते. परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर युती करणार की नाही याबद्दल अजून भूमिका स्पष्ट केली नाही.

२०१४च्या तुलनेत शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक वाढ नोंदविली आहे, तर भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तथापि, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उत्साह कमी झाला नाही आणि त्यामुळे या शक्यता प्रत्यक्षात खऱ्या न झाल्यास पुढील ५ वर्षे भाजपा-शिवसेना युती पुन्हा राज्य करेल, असे देखील चव्हाण म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या