22 February 2025 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा
x

ऑपरेशन कमळ राज्यात शक्य नाही | आमदार फुटलाच तर त्याचं डिपॉजिट जप्त

MahaVikas Aghadi, minister Jayant Patil, BJP Operation lotus

कोल्हापूर, २१ नोव्हेंबर: महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून लवकरच महाविकास आघाडी सरकार पडणार असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार करत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष कधी पूर्ण केलं ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देखील समजलं नसावं. त्यामुळे महाविकास आघाडीचे मंत्री वारंवार भाजपच्या ऑपरेशन लोटसची खिल्ली उडवत आहेत.

यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा आव्हान दिलं आहे. याबाबत ते म्हणाले की, ‘जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे ‘ऑपरेशन कमळ’ महाराष्ट्रात शक्य होणार नाही, आमदार फुटलाच तर त्याचं डिपॉजिट जप्त होईल, त्यामुळं महाविकास आघाडीचे हे सरकार पंधरा नव्हे पंचवीस वर्षे टिकेल, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला, तर करोना काळातही भारतीय जनता पक्षाचे नेते राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यामध्ये उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कायम ठेवण्यासाठी शिवसेना सोबत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही कायम सोबत ठेवा, असा टोला मारला. त्यानंतर मुश्रीफांनी हाच धागा पकडत टोलेबाजी केली.

दुसरीकडे ‘आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये. भारतीय जनता पक्षाला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवावा’, असा टोला नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ”कर्तृत्ववान मराठा स्त्रिया” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असं मत व्यक्त केलं होतं. शेलारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर परब यांनी आज शेलारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

 

News English Summary: As long as Sonia Gandhi, Sharad Pawar and Uddhav Thackeray are together, BJP’s ‘Operation Lotus’ will not be possible in Maharashtra. Water Resources Minister Jayant Patil criticized Hasan Mushrif for attacking the Bharatiya Janata Party (BJP) and for trying to make a political dent in the BJP during the Corona era.

News English Title: MahaVikas Aghadi minister Jayant Patil criticize BJP over operation lotus News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x