19 April 2025 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

भाजप-सेना युतीची चर्चा काही दिवसांपूर्वीच थांबल्याचे वृत्त; मनसेच्या देखील बैठका सुरु

BJP, Shivsena, Alliance, Vidhansabha Election 2019, Assembly Election 2019, Uddhav Thackeray, CM Devendra Fadanvis

मुंबई : विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य करुन दिवाकर रावतेंनी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते काल एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखत त्यांनी युतीबद्दलच्या शक्यता आधीच वर्तवल्या आहे.

लोकसभा निवडणुकीआधी युती करताना भारतीय जनता पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचं, तसेच विधानसभेला शिवसेनेला १४४ म्हणजेच निम्म्या जागा देण्याचं आश्वासन त्यावेळी भाजपने दिलं होतं. त्यामुळे जर शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, युतीची चर्चा मागील काही दिवसांपासून थांबवल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून मिळाली आहे. तत्पूर्वी युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला आहे, त्यात शिवसेना विश्वासघात करणार नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीत काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिल्याने युतीची चर्चा पुढे सरकली नाही. शिवसेनेला जास्तीत जास्त १२० जागा सोडण्याचा भाजपाचा इरादा आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येणार यातून पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार हे संकेत दिले आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपाचं ठरलंय असं म्हणणारे नेते आता युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं सांगून उत्तर देणं टाळत आहे. दरम्यान, एकीकडे युती होणारच अशी शेवटपर्यंत चर्चा रंगवून प्रसार माध्यमांमध्ये उत्सुकता ताणून धरण्याची २०१४ मधील रणनीती भाजप-सेनेने यावेळी देखील कायम ठेवली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील त्यावर बारीक लक्ष असल्याचं समजतं. त्या अनुषंगाने मनसेने देखील जोरदार आखणी सुरु केल्याचे वृत्त आहे आणि त्यासंबधीत जिल्हा निहाय बैठका सुरु आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या