19 April 2025 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

एमआयएम पसरेल; पण भारिप उमेदवाराला मुस्लिम समाज मतं देईल? सविस्तर

MIM, prakash ambedkar, Asaduddin owaisi, Imtiyaz jalil, State Assembly Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आलेल्या निकालानंतर एकूण ८ लोकसभा क्षेत्रात काँग्रेसला वंचित आघाडीच्या उमेदवारांकडून फटका बसल्याची आकडेवारी समोर आली. वास्तविक स्वतः प्रकाश आंबेडकरांनी बहुजन समाजाची मतं एमआयएम’ला मिळाली नसल्याची खंत बोलून दाखवली होती. मात्र एकमेव जागा लढणाऱ्या एमआयएम’ने औरंगाबादची जागा मात्र खिशात टाकल्याचं पाहायला मिळालं. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात जोरदार वाहू लागले असले तरी वंचित बहुजन आघाडीकडून संपूर्ण राज्यात उमेदवार देण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. युती आणि आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. अशातच वंचितचा घटक पक्ष असलेल्या एमआयएमने विधानसभेच्या तब्ब्ल १०० जागांची मागणी प्रकाश आंबेडकरांकडे केली आहे. वास्तविक प्रकाश आंबेडकरांनी उत्तर प्रदेशातील सपा-बसपा युतीकडून काहीच धडा घेतल्याचं दिसत नाही.

विधानसभेसाठी एमआयएमची हाव बरीच वाढली आहे आणि त्याच मूळ कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे पारंपरिक मतदार. त्यामुळे त्यांना अधिक जिंकण्याची आशा वाटते आहे, अशा तब्बल १०० जागांची यादी एमआयएमने तयार केली आहे. या जागांची यादीसुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे. या विषयी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची लवकरच बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एमआयएमने फक्त एक जागा लढवली होती आणि त्यात त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळे आता एमआयएमने केलेली १०० जागांची मागणी प्रकाश आंबेडकर मान्य करतात का हे पाहणे महत्वाच ठरणार आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना काही राजकीय फायदा होईल किंवा नाही हे सांगता येत नसले तरी त्यांच्या मतदाराच्या आडून एमआयएम मात्र राज्यभर पसरेल असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. प्रकाश आंबेडकरांमुळेच एमआयएम ही हिंमत करत आहे, अन्यथा मुल्सिम समाज २०१४ मध्येच त्यांचा हेतू ओळखून होता आणि यापुढे अधिक सावध होऊन भाजपाला फायदा होईल असं काहीच करणार नाही आणि झाल्याचं तर ते केवळ औरंगाबाद पुरतं मर्यादित असेल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी देखील स्वार्थी राजकारण ओळखून चालून आलेली राजकीय संधी वाया न घालवता, स्वतःचा राजकीय फायदा होईल असा पक्षांसोबत युती करणेच फायद्याचे ठरेल असं अनेकांनी मत व्यक्त केले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या