22 April 2025 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही, जितेंद्र आव्हाडांनी भाजपला सुनावले

Minister Jitendra Awhad, Maharashtra BJP, Corona Crisis

मुंबई, २९ मे : स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटीप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. मात्र स्थलांतरीत मजुरांच्या प्रवासासाठी राज्यांनीच खर्च केल्याचं खुद्द केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनीच सर्वोच्च न्यायालयाला सांगतिलं आहे. आणि तुषार मेहता यांच्या या युक्तीवादाचा हवाला देत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही महाराष्ट्र भाजपवर जोरदार टीका केलीय. भाजपा आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकांना मुर्ख बनवत आली आहे, हा महाराष्ट्र द्रोह आणि महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजला सुनावले आहे.

राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलंय. ‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट आहे, असं गुजरात उच्च न्यायालयानं म्हटल्याचं आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून निदर्शनास आणलंय. मुंबई व महाराष्ट्रातील परिस्थिती चांगली असल्याचं सांगताना त्यांनी नीती आयोग व आयसीएमआरचे दाखलेही दिले आहेत. तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

मजुरांच्या प्रवासाचा खर्च केंद्र सरकारनं केल्याच्या दावाही आव्हाड यांनी खोडून काढला आहे. परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या रेल्वेचे सगळे पैसे हे महाराष्ट्र सरकारने दिले, असं खुद्द केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्याचं आव्हाड यांनी एका वृत्ताचा हवाला देऊन म्हटलं आहे.

 

News English Summary: The ruling party and the opposition have been at loggerheads over the issue of train tickets for migrant workers. However, Tushar Mehta, the Advocate General of the Center, has told the Supreme Court that the states have paid for the migration of migrant workers. And citing Tushar Mehta’s argument, state housing minister Jitendra Awhad also slammed the Maharashtra BJP.

News English Title: Minister Jitendra Awhad slam to Maharashtra BJP News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या