17 April 2025 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

राज्यातील विधानसभा निवडणुक फक्त व फक्त कागदी मतपत्रिकांवरच व्हाव्यात: राज ठाकरे

Raj Thackeray, MNS, EVM Hacking, EVM, Ballet Paper, Election Commission of India

नवी दिल्ली: ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असल्यानं महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्य निवडणूक आयोगाची प्रत्यक्ष भेट देखील घेतली. मागील २० वर्षांपासून ईव्हीएमवर सर्वांनीच शंका घेतली आहे. २०१४ आधी भारतीय जनता पक्षाने देखील ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला होता. परंतु २०१४ नंतर त्यांचा पूर्ण सूर बदलला, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या भेटीबद्दलची माहिती दिली.

ईव्हीएमची चीप अमेरिकेतून येत असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. त्यामुळे ईव्हीएम हॅक करण्यात परकीय शक्तीचा हात असू शकतो, असं राज ठाकरे निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेवर घ्या. त्यामुळे मतदारानं कोणाला मतदान केलं आहे, हे मतदाराला समजेल, असं राज ठाकरे म्हणाले. मतपत्रिकेची मोजणी केल्यामुळे २ दिवस उशिरा मतमोजणी पूर्ण होईल. परंतु ज्या देशात २ महिने लोकसभेची निवडणूक चालते. त्यात आणखी २ दिवसांची भर पडल्यास काय फरक पडणार, असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.

मी केवळ औपचारिकता म्हणून मुख्य निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. निवडणूक आयोगाला भेटलात का?, असं तुम्ही विचाराल म्हणून त्यांची (आयोगाची) भेट घेतल्याचं राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले. महाराष्ट्रात गेल्यावर ईव्हीएमबद्दलची भूमिका ठरवू, असं राज यांनी सांगितलं. गेल्या ऑगस्ट महिन्यात सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना यासाठी पत्र पाठवलं होतं. परंतु त्यावेळी कोणीही ऐकलं नाही. पण आता नक्की विचार करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या