19 April 2025 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

भाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय झालं आत्महत्यालय : राज ठाकरे

मुंबई : आमचे सरकार काँग्रेस सरकारपेक्षा वेगळे आहे असा दावा करणारे भाजप सरकार खरोखरच वेगळे आहे, कारण भाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय आता आत्महत्यालय झालाय अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

काही दिवस पूर्वीच शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा उपचारादरम्यान हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला होता. त्यात आता पुन्हा एका तरुणाने मंत्रालयासमोर समोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्नं केला. मंत्रालयात वारंवार होणाऱ्या या घटना पाहता महाराष्ट्राचं मंत्रालय आता आत्महत्यालय झालंय असे ते म्हणाले.

मोठा अविर्भाव आणून आमचे सरकार काँग्रेस सरकारपेक्षा वेगळे आहे असा दावा करणारे भाजप सरकार खरोखरच वेगळे आहे कारण भाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय आता आत्महत्यालय झालाय अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्राचा शेतकरी हा आता त्याच्या शेतात आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्या करून घेत आहे आणि अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे भाजप सरकार हे काँग्रेस सरकार पेक्षाही कितीतरी भयानक आहे असे राज ठाकरे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या