30 April 2025 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

कोल्हापूर-सांगलीकरांना सावरायला ६ महिने जातील; त्यांच्यासाठी अधिक वेळ घ्या; निवडणूक पुढे ढकला

MNS, Raj Thackeray, Amit Thackeray, State Assembly Election 2019, Sangali Flood, Kolhapur Flood, Election Commission of India

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.

सध्याच्या परिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांची घरदार आयुष्यच नष्ट झाली आहेत आणि ती परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी ६ महिने लागतील. तसेच पूर जरी ओसरला तरी मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची भीती देखील व्यक्त केली आणि विषयाचे गांभीर्य प्रसार माध्यमांच्या समोर मांडले. अशा परिस्थितीत तिथली लोकं अडकली असताना त्यांच्याकडे मत जाऊन मागायची का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या याच विषयाला अनुसरून सुरु असलेल्या मार्केटिंग आणि राजकारणाचा देखील त्यांनी समाचार घेतला. विशेष म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ‘सरकारला हा पूर परिस्थितीचा अंदाज आला नव्हता आणि त्यामुळे मदत पोहोचण्यास सुरुवात झाल्याचे’, त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हटले होते. नेमका त्याच विषयाचा धागा संदर्भ घेत राज ठाकरे म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटलांना पूर परिस्थितीचा अंदाज येत नाही, मात्र कोणत्याही निवडणुकीत किती जागा निवडून येणार याचा त्यांना अचूक अंदाज येतो’ असा टोला लगावला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या