तर राज ठाकरे हिंदुत्वासोबत नाशिक महापालिकेप्रमाणे विकासाचा पॅटर्न औरंगाबाद'मध्ये राबवतील

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या मनसेने हिंदुत्वाची कास धरली असली तरी राज ठाकरे हे एक विकासाचं व्हिजन असणारे राजकीय नेते असं आजही राज्यातील लोकांचं मत आहे. औरंगाबादमध्ये ते हिंदुत्वासोबत विकासाला देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतील अशीच शक्यता आहे. कारण हिंदुत्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षासोबत बांधून ठेवेल तर विकासाचा प्रचार मतदाराला मनसेकडे आकर्षित करेल, अशी योजना असावी असं प्राथमिक स्तरावर दिसतं.
मागच्या वेळी जेव्हा राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी ‘औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात’ शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तीशी संवाद साधला होता. त्यावेळी, उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी विकासासोबत औरंगाबाद शहर आणि राजकारणातील वास्तव सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला होता.
उपस्थित संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले होते की, ‘तुम्ही राजकारणाचे बळी ठरला आहात, घाबरून मतदान करता. एकदा डोळे उघडून नीट बघा, कानावरचे हात बाजूला काढा. आधी तुम्ही बदला मग शहर बदलेल. मनसेला संधी द्या, मी स्वच्छ आणि सुरक्षित शहर देतो.” असं आवाहन राज ठाकरे यांनी औरंगाबादवासीयांना दिलं होतं.
त्यावेळी औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकारणातील एक खंत व्यक्त केली होती की, ‘विकास कामांवर मतदान होतं याच्यावरचा माझा विश्वासच उडाला आहे. तुम्ही विकासाला मतदानच करत नाही. केवळ अडचणीच्या वेळीच तुम्हाला राज ठाकरे आठवतो असं सांगताना नाशिक महापालिकेत झाले तसे काम तुमच्या शहरात देखील होऊ शकतात ,”असा विश्वास त्यांनी औरंगाबादवासीयांना दिला होता.
औरंगाबाद शहरातील राजकारणावर बोट ठेवत त्यांनी काही स्थानिक मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनी म्हटलं की, औरंगाबाद शहरात राजकारणी तुम्हाला भीती दाखवतात, निवडणुकीच्या वेळी दंगली घडवल्या की तुम्ही पुन्हा त्यांनाच मतदान करता, मग कशाला हवा तुम्हाला विकास असा घणाघात राज ठाकरेंनी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष एमआयएम’वर केला होता.
त्यावेळी त्यांनी औरंगाबाद शहरातील गाजलेला कचरा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. मागील २५ वर्षात तुमचे शहर आणि खासदार यातील काहीच बदलले नाही आणि त्यामुळे नागरिक म्हणून त्यांना तुमची भीतीच उरलेली नाही. हेच कारण आहे की,’कचरा प्रश्न तसाच रेंगाळत पडला आहे’. नाशिक शहरात मनसेने काही नसतांना खूप चांगल्या गोष्टी केल्या. औरंगाबादकडे तर जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेण्या आहेत.याचा अर्थ जगभरातील विमानं तुमच्या शहरात उतरायला हवीत. या लेण्यांची योग्य काळजी आणि मार्केटिंग केले तर महाराष्ट्राला हजारो कोटीच उत्पन्न मिळेल असं राज ठाकरे म्हणाले होते.
‘राजकारण आणि मतदान हसण्यावारी घेऊ नका असे आवाहन मनसे अध्यक्षांनी त्यावेळी उपस्थितांना केले होते. छोट्या मोठ्या घटनांना घाबरू नका, एकदा मला संधी द्या, मग बघतो तुम्हाला कोण हात लावतो ते’, असा विश्वास व्यक्त करतानाच पुढच्या वेळी मी येईन तेव्हा औरंगाबाद शहराच्या विकासाचा आराखडा तुमच्या समोर ठेवीन असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला होता. पुढे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे आहे. निवडणुकीपुरते ‘ते’ हैद्राबाद वरुन येतात, भीतीदायक वातावरण करतात, दोघांचाही लाभ करुन ५ वर्षासाठी निघून जातात.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने राजनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC कंपनीच्या मार्फत ‘आदित्य संवाद’ हा उपक्रम राबवला होता. त्यावेळी औरंगाबाद’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक तरुणाने आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताना मनसेने नाशिक’मध्ये जी विकास कामं करून दाखवली होती, तो मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये शिवसेनेला का जमली नाहीत असे प्रश्न विचारात आदित्य ठाकरेंना घेतले होते. त्या तरुणाला उत्तर देताना देखील आदित्य ठाकरे यांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळालं होतं. यावरून स्थानिक लोकांना मनसेकडून आशा आहे, मात्र मनसेला दिल्लीतील ‘आप’ सरकार’प्रमाणे ते लोकांपर्यंत पोहोचवता यायला हवं असं तज्ज्ञांना आजही वाटतं. त्यामुळे हिंदुत्व आणि औरंगाबादचा विकास हेच मनसेचे प्रमुख मुद्दे असतील असा अंदाज व्यक्त केला जातं आहे.
Web Title: MNS Party will provide clean and safe city says Raj Thackeray to Aurangabad City citizens.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB