23 February 2025 9:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? - जयंत पाटील

NCP, MLA Jayant Patil, Sharad Pawar, Farmers, Onion Producers, Devendra Fadnvis, Uddhav Thackeray, Shivsena, BJP Maharashtra

सांगली : कांदा अनुदानावरून एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात सरकारवर पुन्हा लक्ष केले आहे. अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान ४ महिने १५ दिवस उलटून देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेले नाहीत, असे जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हंटले आहे. राज्यातील कांदा उत्पादक अत्यंत हलाकीच्या आणि अडचणींचा सामना करत असताना देखील राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली पाहायला मिळत नसल्याने आमदार जयंत पाटील यांनी युती सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण राज्यभर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान कांदा अनुदानावरून जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित होते, असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

एवढंच नव्हे तर खुद्द अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान साडेचार महिने उलटून देखील बळीराजाच्या बँक खात्यात जमा झालेलं नाही, असा आरोप करत असले सरकार काय कामाचे? असा खडा सवाल देखील जयंत पाटील यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांस कांदा अनुदानाचे ३८७ कोटी कधी मिळणार? असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x