22 February 2025 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'सेनेतील आ. पाचपुतेंना श्रीगोंद्यात धक्का; पंचायत समिती खालसा

BJP MLA Babanrao Pachpute

श्रीगोंदा: श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना जोरदार धक्का देत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. या निवडणूकीत सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे. त्यामुळे हा निकाल म्हणजे माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडीत भाजपच्या पंचायत समिती सदस्या आशा सुरेश गोरे यांनी एन वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या सभापतीपदी गीतांजली शंकर पाडळे तर उपसभापतीपदी रजनी देशमुख यांची निवड करून पंचायत समिती वर काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीचा झेंडा फडकवला आहे. भाजपचे सदस्य असलेले अमोल पवार यांचे जात पडताळणी प्रमाणपत वेळेत सादर न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे भाजपचे ६ व आघाडीचे ६ असे समान संख्याबळ झाले होते.

महाविकास आघाडीच्या हालचालीनंतर भारतीय जनता पक्षाने बहुमत सिद्ध करण्यापूर्वी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केलं होतं. भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबवूनच कमळ फुलवलं होतं, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही ती तयारी सुरू केली होती. मात्र सर्वात हासास्पद गोष्ट म्हणजे राजकारणात वजन शिल्लकच राहिलेलं नसलेल्या नारायण राणे, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील आणि बबनराव पाचपुते यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली होती.

राजकारणात वेगळा पक्ष काढून देखील डाळ न शिजल्याने नारायण राणे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची वेळ आली आणि त्यात जेव्हा नारायण राणेंनी आपण प्रयत्न करणार असल्याचं म्हटल्यावर सुधीर मुंनगंटीवार यांनी त्याला छेद देत राणेंचं भाजपातील वजन निश्चित केलं होतं. आता हेच नेते स्वतःच्या मतदासंघात पंचायत समित्या स्वतःच्या पक्षाकडे राखण्यात देखील असमर्थ ठरत आहेत. तीच अवस्था आता राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या आमदार बबनराव पाचपुते यांची झाली आहे.

 

Web Title:  NCP Party won Srigonda Panchayat Samiti from BJP MLA Babanrao Pachpute.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x