22 February 2025 2:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

मुख्यमंत्री तेल लावल्यावर कसे दिसता जरा कळू द्या; तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा: जयंत पाटील

CM Devendra Fadnavis, NCP Leader Jayant patil

सांगली: तेल लावलेला पैलवान विषयावरून राष्ट्र्वादीने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधक कमजोर दिसत असल्याने निवडणूक एकतर्फी होणार असं वाटू लागल्याने ते सभांमध्ये वारंवार त्याचा उल्लेख करत आहेत. युतीशी सामना करण्यासाठी तुल्यबळ विरोधकच शिल्लक न राहिल्याने निवडणूक एकतर्फी होणार आणि आमच्या विरुद्ध तूल्यबळ विरोधक म्हणजे पैलवानंच नसल्याचं मुख्यमंत्री टोला लगावत आहेत.

मात्र आता फडणवीसांच्या त्याच शब्दाचा उल्लेख करत एनसीपीने त्यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. ‘शरद पवार यांच्याविरोधात कट-कारस्थान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी जनता एकवटली आहे,’ असं म्हणत ईडीच्या मुद्द्यावरून एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सांगलीत बोलताना जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

‘आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे पैलवान आहोत. पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले फोटो लावलेला प्रसिद्ध करावा. एकदा कळू द्या तेल लावल्यावर कसे दिसत आहेत,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेली खालच्या स्तरातील टीका महाराष्ट्र सहन करणार नाही,’ असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून काँग्रेस-एनसीपी आघाडीची सत्ता येणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. एनसीपीच्या प्रदेशाध्यक्षांच्या या दाव्याला भाजप आणि शिवसेना कसं उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x