महत्वाच्या बातम्या
-
Disha Salian | सीबीआयकडून मोठा खुलासा, दिशा सालियन नशेत असताना अपघाती मृत्यू, खोटारड्या राणे पितापुत्राचं भांड फुटलं
Disha Salian | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे है तो मुमकिन है? महाराष्ट्रातील गुजरात सीमेवरील जिल्ह्यांमध्ये गुजरात निवडणुकीसाठी सुट्टी जाहीर, आदेश काढले
Gujarat Assembly Election 2022 | गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधींचीही गुजरातच्या प्रचारात सोमवारी एंट्री झाली. प्रशासनचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रात शिंदे सरकारचा गुजरात निवडणुकीसंदर्भातला एक निर्णय खूप चर्चेत आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला.
2 वर्षांपूर्वी -
पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाही, तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांला नापास करता येणार नाही, पुस्तकाला वह्यांची पानं - शिक्षण मंत्री
Maharashtra Education Model | पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणात्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती राबविण्याचे सुतोवाचही केसरकर यांनी केले.
2 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टात 29 नोव्हेंबरला सुनावणी, तर शिंदे गट 2 दिवस आधी गुवाहाटीला, राजकीय भूकंपाचे संकेत? मोठी बातमी
Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वकिलांना या खटल्याचे लेखी स्वरूपात संकलन पूर्ण करण्यास सांगितले आणि चार आठवड्यांत मुख्य मुद्दे विचारात घेऊन ते लेखी स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वाधिक धाकधूक शिंदे गटाची झाल्याची बातमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
देवेंद्रजी सुधांशू त्रिवेदींची अशी पाठराखण का करताय? चुकीच्या विधानाचं समर्थन करू नका, संभाजीराजे संतापले
Chhatrapati Sambhajiraje | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे. या वादावर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ७१ व्या ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिपचा समारोप कार्यक्रम काल पुण्यात पार पडला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
2 वर्षांपूर्वी -
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने शिवछत्रपतींना माफीवीर म्हटलं तरी राज्य भाजप शांत, तर सावरकरांसाठी रस्त्यावर उतरलेल्या मनसेचा डिजिटल निषेध
Chhatrapati Shivaji Maharaj | वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली. ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली,’ या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले. या विधानावरून राहुल गांधींना उत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजप प्रवक्त्यानं केलेल्या विधानावरून काँग्रेसनं टीकास्त्र डागलंय.
2 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ५ वेळा औरंगजेबला पत्र लिहिली होती, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ताचा वृत्त वाहिनीवर संतापजनक दावा
Veer Savarkar Letter to British | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ते सतत वादात अडकतात. त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागते. आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटला असताना आता त्यापुढचा अंक भाजपने सुरु केला आहे का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी सध्याचे आदर्श, राज्यपालांचं संतापजनक विधान
Governor Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ते सतत वादात अडकतात. त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागते. आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. विविध घटकातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण, ते सावरकरांबाबतच सत्य असंही म्हटलं
Veer Sarvarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांची पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते. त्यांनीच इंग्रजांना तसं पत्र लिहिलं होतं, असा दावा करणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला आहे. विविध राजकीय पक्ष तसेच हिंदू संघटनांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shraddha Walkar Murder | शिकलेल्या मुलीच ‘लिव-इन’च्या शिकार होतात, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून समस्त सुशिक्षित मुलींचा अपमान
Shraddha Walkar Murder Case | केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी व्यक्त होताना केलेलं विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी मुलींचं शिक्षण आणि लिव इन रिलेशन यांचा एकमेकांशी विचित्र पद्धतीने संबंध जोडला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता टीकाही होऊ लागली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्यावर निशाणा सााधलाय.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | शिंदे गटाच्या महिला कार्यकर्तीने राहुल गांधींऐवजी सावरकरांवरच चप्पल उगारली, मारणार इतक्यात.. पहा व्हिडिओ
Video Viral | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्याबाबत विधान केलंय. त्याला आता कडाडून विरोध होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलीय.”स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही”, अशा शब्दात फडणवीस यांनी राहुल गांधी यांना इशारा दिलाय.
2 वर्षांपूर्वी -
वीर सावरकरांबाबत आमच्या मनात नितांत आदर, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसणाऱ्या मातृसंस्थेच्या पिल्लांनी सावरकरांवर बोलू नये
Uddhav Thackeray | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी आमच्या मनात नितांत आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याविषयी आम्हाला कुणीही शिकवायची गरज नाही. ज्या लोकांची मातृसंस्था स्वातंत्र्य लढ्यात सहभागीही झाली नव्हती त्यांनी आम्हाला वीर सावरकरांबाबत काहीही शिकवायाची गरज नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
वीर सावरकरांना भारतरत्न द्या, ढोंगी प्रेम दाखवू नका, संजय राऊतांनी भाजपाला घेरलं
Sanjay Raut | वीर सावरकर यांच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीवर टीका केली होती. त्या टीकेला आज संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे गटातील पोंक्षेच्या वक्तव्याने वाद होणार?, म्हणाले 'बाजीराव पेशवेंनी मनात आणलं असतं तर छत्रपतींची गादी बळकावू शकले असते'
Sharad Ponkshe | शरद पोंक्षे आपल्या व्याख्यानासाठी महाराष्ट्रभर दौरा करत असतात. चित्रीकरणामधून वेळ काढत ते व्याख्यान करतात. यादरम्यानचे काही व्हिडीओ शरद पोंक्षे सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ते वादात अडकू शकतात अशी चिन्हं आहेत. बाजीराव पेशवे यांचा उल्लेख करताना शरद पोंक्षे यांनी एक वक्तव्य केलं आहे त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
आव्हाडांवर गुन्हा दाखल करणारी भाजप महिला पदाधिकारी रिदा अजगर रशीद सुद्धा वादात, विरोधात गुन्हे दाखल, सध्या जामिनावर?
MLA Jitendra Awhad | चित्रपटगृहात जाऊन शो बंद केल्याच्या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड जामीनावर बाहेर आले. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला. जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याची तक्रार महिलेनं केलीये. यावरून वादविवाद सुरू झालेले असताना त्या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय.
2 वर्षांपूर्वी -
जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, ठाण्यात तणावाचं वातावरण, ईडी-सीबीआय नंतर विरोधकांविरोधात महिलास्त्र?
MLA Jitendra Awhad | हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात मुक्काम कराव्या लागलेल्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत भर पडलीये. जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणाचे पडसाद ठाण्यात उमटण्यास सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर टायर जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्यात. प्रकरणावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनीही ट्विट करत आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल केलाय.
2 वर्षांपूर्वी -
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये फडणवीसांच्या गृहखात्यावर देखील मुख्यमंत्री शिंदेंचा दबदबा? समर्थकांसाठी छुपं लॉबिंग?
Maharashtra Police | राज्यात २८ उपआयुक्त आणि अधिक्षक दर्जाच्या एकूण २८ पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील १३ जणांना मुंबईमध्ये पोस्टिंग मिळाली आहे. गृह विभागाने शनिवारी रात्री उशीरा याबाबतचे आदेश जारी केले. शिंदे-फडणवीस सरकारने मागील काही दिवसात प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु केले आहे. नुकतेच काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या.
2 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरे देवाघरी गेल्यानंतर दोन वेळा खासदारकी, तरी किर्तीकर म्हणाले बाळासाहेब गेले अन् मला डावललं, शिंदेंची स्क्रिप्ट?
MP Gajanan Kirtikar | उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कीर्तिकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे नेतेपदही काढून घेण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ketaki Chitale | पोलिसांना पत्र पाठवून एखाद्यावर कोणती कलमं लावावी असं सांगता येतं? होय केतकीने तो प्रकार केला आहे
Ketaki Chitale | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी चित्रपट बघायला आलेल्या प्रेक्षकाला मारहाणही केली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये आंदोलन केलं.
2 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाण प्रकरण, भाजपची सत्ता येताच याच प्रश्नावर चित्रा वाघ यांनी पत्रकारांना दम भरला, म्हणाल्या 'सुपारी घेऊन प्रश्न विचारतात'
BJP Leader Chitra Wagh | दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली होती. या वादात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उडी घेतली होती. त्यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. सिलेक्टिव महिलांचा अपमान हा संपूर्ण राज्यातील महिलांचा अपमान होत नाही. महविकास आघाडीच्या काळात कंगना राणावत, सप्ना पाटकर, नवनीत राणा यांचाही अपमान करण्यात आला होता, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल