महत्वाच्या बातम्या
-
अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार?
MNS Leader Vasant More | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. दुसरीकडे मनसेसाठी महत्वाच्या असलेल्या पुणे शहरात मात्र जमिनीवरील आणि लोकांशी जोडल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांच राजकीय खच्चीकरण राज ठाकरेंच्या जवळील नेतेच करत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यापैकी पुण्यातील एक नेता हा राज ठाकरेंशी अत्यंत जवळीक असलेला असून त्या नेत्याचा सामान्य लोकांशी कोणताही संबंध नाही अशी माहिती आहे. राज ठाकरेंना भाषणावेळी काही राहून गेल्यास मागून चिठ्य्या पोचवताना या नेत्याला अनेकांनी पाहिला असेल. तसेच पुण्यात पक्ष विस्तार किंवा पक्ष संघटनेच्या बळकटीशी या नेत्याचा काडीचाही संबंध नसतो असं स्थानिक कार्यकर्ते सांगत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ?
Chhatrapati Sambhajiraje | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते, असं विधान केलं होतं. या विधानाला आक्षेप घेत संभाजीराजे छत्रपती, छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला. तसेच भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणीही केली.
2 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना वीज बिल भरावच लागणार हा साधा सरळ अर्थ असताना फडणवीसांनी गोलगोल वाक्य फिरवण्याची कला दाखवली
Viral Video | उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातून खास ठाकरी शैलीतून राज्य सरकारचा समाचार घेतला. सरकारवर चौफेर टिका करत त्यांनी जाब विचारला. हे सरकार आश्वासनांची खैरात करणारं आहे, पण प्रत्यक्षात कोणाच्याच पदरात काहीच पडणार नसल्याचे, सांगायला ते विसरले नाहीत. या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तुमच्याकडे बघून धगधगत्या मशाली वाटत आहेत. सरकार कशा पद्धतीने पाडले गेले, ते तुम्ही पाहिले. नितीन देशमुख यांना नेले होते, ते परत आले. काय झाडी काय डोंगर एकदम ओके होते. मी जिजाऊच्या भूमीवर शेतकरी आशीर्वाद घ्यायला आलोय.
2 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टात 29 ला सुनावणी, 50 आमदार आणि 12 खासदारांसाठी गुवाहाटी 5 स्टार हॉटेलात 100 खोल्या बूक, खोके पुन्हा चर्चेत
Shinde Camp in Guwahati | महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वकिलांना या खटल्याचे लेखी स्वरूपात संकलन पूर्ण करण्यास सांगितले आणि चार आठवड्यांत मुख्य मुद्दे विचारात घेऊन ते लेखी स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वाधिक धाकधूक शिंदे गटाची झाल्याची बातमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अवमान केलाच नाही, त्यांनी अडीच वर्षांत खूप चांगले काम केलं - चंद्रशेखर बावनकुळे
BJP Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत राहतात. अलीकडेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा सर्वत्र निषेध होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजत प्रवक्ते व खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वादंग सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
Electricity Bill | मोदी तंत्र? जनतेचं सरकार सांगून जनतेचा बँड वाजवणार, महिन्याचे वीज बिल 200 रुपयांनी महागणार
Electricity Bill | महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकारपुन्हा एकदा झटका देणार आहे. राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे है तो मुमकिन है? शिंदे राजवटीत कर्नाटक भाजपचा आत्मविश्वास वाढला, सांगलीतील 40 गावं कर्नाटकात घेण्याचा हालचाली
Sangli 40 Villages in Jat Taluka | सांगलीच्या जत तालुक्यातील ४० दुष्काळग्रस्त गावांनी नुकताच कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने ही गावे आपल्या राज्यात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे दिसत आहे. यासंदर्भात कर्नाटकच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले की, जत तालुक्यात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आम्ही या गावांना पाणी देऊन मदत केली आहे. आता या ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Disha Salian | सीबीआयकडून मोठा खुलासा, दिशा सालियन नशेत असताना अपघाती मृत्यू, खोटारड्या राणे पितापुत्राचं भांड फुटलं
Disha Salian | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे है तो मुमकिन है? महाराष्ट्रातील गुजरात सीमेवरील जिल्ह्यांमध्ये गुजरात निवडणुकीसाठी सुट्टी जाहीर, आदेश काढले
Gujarat Assembly Election 2022 | गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधींचीही गुजरातच्या प्रचारात सोमवारी एंट्री झाली. प्रशासनचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रात शिंदे सरकारचा गुजरात निवडणुकीसंदर्भातला एक निर्णय खूप चर्चेत आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला.
2 वर्षांपूर्वी -
पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाही, तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांला नापास करता येणार नाही, पुस्तकाला वह्यांची पानं - शिक्षण मंत्री
Maharashtra Education Model | पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणात्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती राबविण्याचे सुतोवाचही केसरकर यांनी केले.
2 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टात 29 नोव्हेंबरला सुनावणी, तर शिंदे गट 2 दिवस आधी गुवाहाटीला, राजकीय भूकंपाचे संकेत? मोठी बातमी
Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वकिलांना या खटल्याचे लेखी स्वरूपात संकलन पूर्ण करण्यास सांगितले आणि चार आठवड्यांत मुख्य मुद्दे विचारात घेऊन ते लेखी स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वाधिक धाकधूक शिंदे गटाची झाल्याची बातमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
देवेंद्रजी सुधांशू त्रिवेदींची अशी पाठराखण का करताय? चुकीच्या विधानाचं समर्थन करू नका, संभाजीराजे संतापले
Chhatrapati Sambhajiraje | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे. या वादावर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ७१ व्या ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिपचा समारोप कार्यक्रम काल पुण्यात पार पडला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
2 वर्षांपूर्वी -
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने शिवछत्रपतींना माफीवीर म्हटलं तरी राज्य भाजप शांत, तर सावरकरांसाठी रस्त्यावर उतरलेल्या मनसेचा डिजिटल निषेध
Chhatrapati Shivaji Maharaj | वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली. ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली,’ या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले. या विधानावरून राहुल गांधींना उत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजप प्रवक्त्यानं केलेल्या विधानावरून काँग्रेसनं टीकास्त्र डागलंय.
2 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ५ वेळा औरंगजेबला पत्र लिहिली होती, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ताचा वृत्त वाहिनीवर संतापजनक दावा
Veer Savarkar Letter to British | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ते सतत वादात अडकतात. त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागते. आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटला असताना आता त्यापुढचा अंक भाजपने सुरु केला आहे का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.
2 वर्षांपूर्वी -
शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी सध्याचे आदर्श, राज्यपालांचं संतापजनक विधान
Governor Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ते सतत वादात अडकतात. त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागते. आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. विविध घटकातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण, ते सावरकरांबाबतच सत्य असंही म्हटलं
Veer Sarvarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांची पेंशन घेत होते. त्यांच्यासाठी काम करत होते. त्यांनीच इंग्रजांना तसं पत्र लिहिलं होतं, असा दावा करणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला आहे. विविध राजकीय पक्ष तसेच हिंदू संघटनांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shraddha Walkar Murder | शिकलेल्या मुलीच ‘लिव-इन’च्या शिकार होतात, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून समस्त सुशिक्षित मुलींचा अपमान
Shraddha Walkar Murder Case | केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी व्यक्त होताना केलेलं विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी मुलींचं शिक्षण आणि लिव इन रिलेशन यांचा एकमेकांशी विचित्र पद्धतीने संबंध जोडला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता टीकाही होऊ लागली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्यावर निशाणा सााधलाय.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | शिंदे गटाच्या महिला कार्यकर्तीने राहुल गांधींऐवजी सावरकरांवरच चप्पल उगारली, मारणार इतक्यात.. पहा व्हिडिओ
Video Viral | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्याबाबत विधान केलंय. त्याला आता कडाडून विरोध होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलीय.”स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही”, अशा शब्दात फडणवीस यांनी राहुल गांधी यांना इशारा दिलाय.
2 वर्षांपूर्वी -
वीर सावरकरांबाबत आमच्या मनात नितांत आदर, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसणाऱ्या मातृसंस्थेच्या पिल्लांनी सावरकरांवर बोलू नये
Uddhav Thackeray | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी आमच्या मनात नितांत आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याविषयी आम्हाला कुणीही शिकवायची गरज नाही. ज्या लोकांची मातृसंस्था स्वातंत्र्य लढ्यात सहभागीही झाली नव्हती त्यांनी आम्हाला वीर सावरकरांबाबत काहीही शिकवायाची गरज नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
वीर सावरकरांना भारतरत्न द्या, ढोंगी प्रेम दाखवू नका, संजय राऊतांनी भाजपाला घेरलं
Sanjay Raut | वीर सावरकर यांच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीवर टीका केली होती. त्या टीकेला आज संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL