महत्वाच्या बातम्या
-
अहवालात वस्तुस्थिती पूर्ण भिन्न | म्हणजे फडणवीसांनी त्याचा उपयोग देशभर संभ्रम निर्माण करण्यासाठी केला?
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारची दिशाभूल करून गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी - अहवाल सादर
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रहिवाशी इमारतीत लसीकरण मोहिम राबवण्याचा महापालिकेचा विचार
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य मंत्रालयाने बुधवारी महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचा नवा ‘डबल म्युटंट’ व्हेरियंट (प्रकार) सापडल्याचे सांगितले. १८ राज्यांत कोरोनाच्या ३ व्हेरियंटचे ७७१ रुग्ण आढळले आहेत. त्यात ७३६ रुग्ण यूके व्हेरियंट, ३४ रुग्ण दक्षिण आफ्रिकन आणि १ रुग्ण ब्राझिलियन व्हेरियंटचा आहे. हे प्रकार अनेक राज्यांतील १०,७८७ पॉझिटिव्ह नमुन्यांच्या तपासणीत आढळले.
4 वर्षांपूर्वी -
मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
आरक्षणाच्या मर्यादेत होऊ शकतो बदल? मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग 9 व्या दिवशी सुनावणी सुरू आहे. या खटल्याची सुनावणी पाच न्यायाधीशांचे घटनात्मक खंडपीठ करत आहे. महाराष्ट्रातील नवीन आरक्षण प्रणालीत जन्मलेली ही बाब आता देशातील सर्व राज्यांच्या आरक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणू शकते. यामुळे कोर्टाने सर्व राज्यांना या प्रकरणात आपला खटला मांडायला नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी झारखंड सरकारची बाजू मांडली आहे आणि माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांची बाजू मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाला आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त असू शकते का याचा निर्णय घ्यावा लागेल.
4 वर्षांपूर्वी -
अपक्ष आमदार येड्रावकर यांनी भाजपासोबत राहण्यासाठी रश्मी शुक्लांनी त्यांची भेट घेतली होती
पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमध्ये पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे सरकार अडचणीत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा डाव आता भाजपवरच उलटणार असल्याची शक्यता डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळे निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस म्हणजे तपास यंत्रणा आहेत का? | त्यांनी आरोप केल्यावर कोणालाही दोषी ठरवायचे का?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं असं विधान केलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
त्यांच्याकडून अभ्यास सुरु आहे | बहुधा ते 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी PhD करत असावेत
महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज (२५ मार्च) राज्यपालांची भेट घेणार होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळणार आहे. राज्यपाल कोश्यारी आजपासून २८ मार्चपर्यंत देहरादून येथे असणार आहेत. दरम्यान, राज्यपालांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. ते २८ मार्चला मुंबईत परततील असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, त्यामुळे विरोधकांची भेट घेतल्यानंतर सत्ताधारी नेत्यांसोबत राज्यपालांची भेट होऊ शकणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते | पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन होईल, नष्ट होईल, असे वर्तन करु नये. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
गंगापूर साखर कारखाना १५ कोटी ७५ लाखांचा कथित अपहार | भाजप आ. प्रशांत बंब यांची चौकशी
गंगापूर साखर कारखान्यात १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या कथित अपहार प्रकरणात गंगापूर येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांची बुधवारी पाेलिसांनी चौकशी केली. पाेलिस अधीक्षक कार्यालयात जवळपास दीड तास झालेल्या चौकशीमध्ये बंब यांच्यावर एफआयआरमध्ये केलेल्या आरोपांविषयी विचारपूस करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांमार्फत भाजप सत्ता गाजवू इच्छिते | मग लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल - शिवसेना
राज्यपाल हेच सरकार चालवतील असं नवं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयक म्हणत असेल तर मग दिल्लीची विधानसभा आणि मुख्यमंत्री हवेतच कशाला ? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सत्ता गाजवू इच्छिते. त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल हेच त्यांचे धोरण आहे. दिल्ली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांचा कचरा करून केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे. देशासाठी हे घातक आहे, असं म्हणत आजच्या (२५ मार्च) सामना अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांचे आरोप | निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार - राज्य सरकार
देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याप्रकरणी बैठकीत चर्चा झाली. अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची किंवा त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे मत बैठकीत सर्व मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. तसेच या आरोपांत किती तथ्य आहे, याचीही सत्यता आयोगामार्फत तपासली जाणार आहे. ‘कमिशन ऑफ एन्क्वॉयरी ॲक्ट’अंतर्गत ही चौकशी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
दूध का दूध, पाणी का पाणी करावे | गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ट्विट
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे. राज्य शासना्च्या या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करत ‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे’, असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Covid 19 Updates | देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील | देशातही रुग्ण वाढ सुरु
महाराष्ट्र आणि गुजरातमधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत चालली आहे. देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.
4 वर्षांपूर्वी -
आमदार फुटत नव्हते | अनपेक्षितपणे निवडक IPS अधिकाऱ्यांचं बंड समोर आलं | आधीच भविष्यवाण्या?
राज्य सरकारशी छुपा वाद झाल्याने तीन अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी गेल्या अडीच महिन्यात प्रतिनियुक्ती तथा डेप्यूटेशनवर केंद्रात गेले आहेत. त्यात राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, महासंचालक (नागरी संरक्षण दल) रश्मी शुक्ला आणि डीआयजी मनोजकुमार शर्मा यांचा समावेश आहे. तर, त्यांच्यापेक्षा उघड आणि मोठा जाहीर वाद नाही तर संघर्ष परमबीरसिंह यांचा झाला, असल्याने ते ही केंद्रात डेप्यूटेशनवर जाणार का याकडे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुखच्या मृत्यूचा तपास NIA ला सोपवावा | सेशन कोर्टाचा ATS ला आदेश
अँटिलिया प्रकरणासंबंधीत मनसुख हिरेनच्या मृत्यूच्या प्रकरणात ठाणे सेशन कोर्टाने बुधवारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (ATS) आदेश दिला की, या प्रकरणाचा तपास थांबवून हा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ला सोपवावा. या प्रकरणात एनआयएने कोर्टाला अपील केले की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतरही एटीएसने त्याकडे तपास हस्तांतरित केला नाही.
4 वर्षांपूर्वी -
आर्किटेक्ट निमगडे हत्या प्रकरणात फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग | राष्ट्रवादीचा आरोप
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या खूनात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली फडणवीसांच्या नागपुरातील धरपेठ येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळात ते स्वत: न्यायाधीश होते | मंत्र्यांवर आरोप होताच ते क्लीन चीट द्यायचे
फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपकडून राज्य सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेत फोन टॅपिंगसह राज्यात सुरू असलेल्या इनतर प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच काँग्रेसला या प्रकरणांमध्ये किती हिस्सा मिळतोय असा सवाल त्यांनी केला होता. आता त्यांच्या या सवालाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार | हायकोर्टात जाण्याचा सल्ला
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा आली आहे. याप्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फोन टॅपिंग प्रकरण | भाजपाच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती
अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, मुंबई पोलिसचे माजी कमिश्नर परिमबीर सिंह यांच्या 100 कोटीच्या वसुलीचा आरोप आणि ट्रान्सफरच्या नावावर लाचखोरीच्या आरोपांदरम्यान भारतीयाजनात पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली आहे. परमबीर सिंह, ट्रान्सफर वाद आणि सचिन वाझेंच्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M