महत्वाच्या बातम्या
-
सुजाण माणसे कशाला हिटलरच्या मागे जातील? अरुणा ढेरेंचं मत
‘जर एखाद्याने वेगळी भूमिका घेतली की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतलाय, असं होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्वजण सुजाण नागरिक आहेत,’ असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी JNU मधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं वक्तव्य केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
खुशखबर! पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा: सरकारचा निर्णय
अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच या ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यात अनेक निवेदनं आणि आंदोलनं करून देखील फडणवीस सरकारने याची दखल घेतली नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी चांगला ज्योतिष शोधावा; महसूलमंत्री थोरात यांचा सणसणीत टोला
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी युतीच्या कमीत कमी २२० जागा निवडून येणार आणि त्यानंतर विरोधीपक्ष नेता करता येईल एवढ्या जागा देखील विरोधकांना मिळणार नसल्याचा छातीठोक दावा केला होता.
5 वर्षांपूर्वी -
जर मनसेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल तर ते भाजपा'सोबत येतील: मा. गो. वैद्य
राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. मंगळवारी म्हणजे ७ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भारतीय जनता पक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी मोठे विधान केले आहे. “जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल. तर ते भारतीय जनता पक्षासोबत येतील,” अशी प्रतिक्रिया मा. गो. वैद्य यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे: फ्रान्सिस दिब्रेटो
“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठी भाषेचा आग्रह धरणारे आहेत. त्यांना सांगा हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा ही मंडळी तुमचं ऐकणार नाहीत.” असंही संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
देशात विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर शांत बसणार नाही: फ्रान्सिस दिब्रेटो
देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शुक्रवारी एल्गार पुकारला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरून अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचिंग), विरोधी मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकारांविरोधात सारस्वतांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. ‘देशाला वेठीस धरले जात आहे,’ अशी सडकून टीका साहित्यिकांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: महाराष्ट्राचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर जाधव जम्मू-काश्मिर सीमेवर शहीद
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धकटवाडी गावचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना जम्मू आणि काश्मिर मध्ये ड्युटी बजावत असताना वीर मरण आले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकंच शोककळा पसरली आहे. धकटवाडीत अत्यंत शोकाकुल वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थकाला बेदम मारहाण; दानवे आणि महाजनांसमोर तुफान राडा
भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना दानवे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी असलेले रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि नाशिक पोटनिवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा भाजपाला धोबीपछाड
राज्यातील सत्तेचं टॉनिक मिळताच शिवसेनेला उभारी आली असून त्याचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत यशाचा आलेख उंचावणाऱ्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
साहित्य संमेलनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाने महानोरांना दिली धमकी
उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ब्राह्मण महासंघाने संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना. धों. महानोर यांना दिली आहे. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ शुक्रवार १० जानेवारी पासून होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या धमकीमुळे आयोजक चिंतेत आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यापासून हे संमेलन वादात सापडले आहे. दरम्यान, संमेलनाला जाऊ नये अशी फोनवरून धमकी मिळाल्यानंतरही ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर उपस्थित राहणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'हा' खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा: शिवसैनिकांचा संताप
जिल्हा परिषदेच्या निवडणुकींमध्ये राज्यात अनेक ठिकाणी फाटाफुटीचं राजकारण झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली. परंतु काही ठिकाणी शिवसेनेतल्या नाराजांनी भारतीय जनता पक्षाला साथ देत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला अशा नेत्यांविरुद्ध आता शिवसैनिकांनी एल्गार पुकारलाय. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला साथ देणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पोष्टर्स लावले आहेत. त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय.
5 वर्षांपूर्वी -
भगवान गडावर पोहोचले मंत्री धनंजय मुंडे; पंकजा मुंडेंना टोला
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज भगवानगडावर जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच भगवान गडावर जातील. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी बोलावलं होतं. आज ते नारायणगड, भगवानगड आणि गहिनीनाथगडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही गडावर धनंजय मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अक्कलकुव्वात शिवसेनेचे कार्यालय जाळले; शहरात जमाव बंदी लागू
काल राज्यात नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला होता. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले होते. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसचे समसमान उमेदवार निवडून आले होते.
5 वर्षांपूर्वी -
गॅस पेटवणं सोपं, पण गोरगरीबाच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे: मुख्यमंत्री
सत्तास्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तिथल्या उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये पहिली घोषणा म्हणजे औरंगाबादच्या बिडकिन भागामध्ये ५०० एकर जमिनीवर अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शिवाय या ५०० एकरपैकी १०० एकर हे फक्त महिला उद्योजिकांसाठी राखीव ठेवण्याचा देखील शब्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘२०२०च्या जून महिन्यात या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं. त्यानंतर मध्ये कुठेही ते काम अडू नये, याची काळजी आपल्याला करायची आहे. नाहीतर फक्त भूमिपूजनाच्या पाट्या आपल्याला जागोजागी दिसतात’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
पवार कुटुंबियांना बारामतीत संपवता संपवता भाजप नागपूर-कोल्हापुरात संपला
नागपुरात आरएसएस’च्या मुख्य कार्यालयासहित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा टिकाव लागणार नाही असं म्हटलं गेलं. मात्र काल धक्कादायक निकाल लागले. याबाबत सत्ताधारी मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावत म्हटलंय की, भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उध्वस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. परंतु, आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्हयात भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्हयात भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागला. नागपूरकरांनी भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त केली त्याची दखल महाराष्ट्र घेईल असं त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
यवतमाळ: पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून सेना-भाजप नेत्यांमध्ये राडा
यवतमाळ पंचायत समिती सभापती निवडीवरून बुधवारी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये राडा झाला. पंचायत समिती कार्यालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदासाठी आज निवडणूक होती.
5 वर्षांपूर्वी -
मनसे आणि भाजपाची वैचारिक भूमिका सारखीच असल्यास भाजप-मनसे युती शक्य: मुनगंटीवार
२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
सध्याचं राजकारण पाहता भविष्यात भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात: आ. राजू पाटील
३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
धुळे झेडपी: मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्या कृपेने भाजप धुळ्यात विजयी
जिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यात ५६ जागांपैकी २५ जागांचा निकाल हाती आला आहे. यात ३१ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब लावला आहे. मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचा पारंपरिक मतदार भारतीय जनता पक्षाकडे वर्ग झाला आणि परिणामी त्याचा मोठा फायदा भाजपाला झाल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'सेनेतील आ. पाचपुतेंना श्रीगोंद्यात धक्का; पंचायत समिती खालसा
श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना जोरदार धक्का देत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. या निवडणूकीत सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे. त्यामुळे हा निकाल म्हणजे माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP